‘दो मस्ताने चले, चुना लगा के…’; संजय राऊत यांची कोणावर जोरदार हल्ला?
यावेळी राऊत यांनी जोरदार टोलेबाजी केली. देशात, राज्यात आणि मुंबईत सत्ताधारी पक्षाकडून लूट केली जात आहे, असं राऊतांनी टीकास्र सोडलं. तर यावेळी राऊत यांनी, आदित्य ठाकरे यांनी संपूर्ण मुंबईचा ‘रोडमॅप’च आपल्यासमोर ठेवला आहे. मुंबईची कशी लुटालूट सुरू आहे, हे त्यांनी सांगितलं.
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चारोळी म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. त्यांनी ही टीका वरळी येथील राज्यव्यापी शिबीरात केली. यावेळी राऊत यांनी जोरदार टोलेबाजी केली. देशात, राज्यात आणि मुंबईत सत्ताधारी पक्षाकडून लूट केली जात आहे, असं राऊतांनी टीकास्र सोडलं. तर यावेळी राऊत यांनी, आदित्य ठाकरे यांनी संपूर्ण मुंबईचा ‘रोडमॅप’च आपल्यासमोर ठेवला आहे. मुंबईची कशी लुटालूट सुरू आहे, हे त्यांनी सांगितलं. होय, मुंबईची लूटच सुरू आहे. यासाठी दुसरा शब्द नाही. महाराष्ट्रात लूट… मुंबईत लूट… देशात लूट… या लुटीच्या कथा ऐकून मला दोन ओळी सुचल्या. ‘दो मस्ताने चले जिंदगी बनाने, चुना लगा के पुरा देश डुबाने’. तर हे दोन मस्ताने जसे दिल्लीत आहेत, तसे महाराष्ट्रातही आहेत. ते महाराष्ट्र आणि मुंबईला लुटतायत.
Published on: Jun 19, 2023 07:33 AM
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
