AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिला अत्याचाराच्या बाबतीत जात पात येता कामा नये -उद्धव ठाकरे

महिला अत्याचाराच्या बाबतीत जात पात येता कामा नये -उद्धव ठाकरे

| Updated on: Aug 21, 2022 | 4:50 PM
Share

सर्व पक्षांनी एकत्र येऊन एक काम केलं पाहिजे की माझ्या पक्षाचा कार्यकर्ता असेल तर त्यालाही याबाबतीत दया नाही. असं काही घडलं तर पक्ष भेद विसरून सगळे एकत्र आले पाहिजे केवळ तुमच्या सरकार आहे म्हणून आम्ही बोलतोय आमचं सरकार आहे म्हणून तुम्ही बोंबलत आहेत असं नको व्हायला

मुंबई – आपण आपल्या महाराष्ट्र ज्याला आपण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र मानतो नव्हे तो आहेच तरीसुद्धा महिलांवरील अत्याचाराच्या अशा या घटना घडतात. पण शिवसेनेने (Shivsena)एक प्रश्न तो उचलला आपल्याला महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना राहणाऱ्यांसाठी सगळ्यांसाठीही तो एक महत्त्वाचा सुद्धा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना आपल्या महाराष्ट्र(Maharashtra) घडता कामा नये. मग महिला अत्याचाराबद्दल बोलत असताना विचार करत असताना निदान त्याच्यात तरी जात-पाच धर्म येता कामा नये. महिला महिला म्हणून मगटी बिल्किस बानो असो किंवा निर्भयाच्या बाबतीत झालं होतं दिल्लीच्या बाबतीत आणि देशाचे डोळे खाडकन करून उघडले होते. तसंच हे जे काय असेल आपण त्यावर महिला दिनाच्या वेळेला मी बोललो होतो की सर्व पक्षांनी एकत्र येऊन एक काम केलं पाहिजे की माझ्या पक्षाचा कार्यकर्ता असेल तर त्यालाही याबाबतीत दया नाही. असं काही घडलं तर पक्ष भेद विसरून सगळे एकत्र आले पाहिजे केवळ तुमच्या सरकार आहे म्हणून आम्ही बोलतोय आमचं सरकार आहे म्हणून तुम्ही बोंबलत आहेत असं नको व्हाययाला असेही उद्धव ठाकरे (udhav Thakarey ) म्हणाले

Published on: Aug 21, 2022 04:50 PM