VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 3 October 2021
बेळगावात 15 टक्के मराठी भाषिक असल्याचा कर्नाटकच्या जनगणनेत अजब निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. कर्नाटक सरकारचा हा संपूर्ण रिपोर्ट खोटा आहे. त्यावर महाराष्ट्र सरकार भूमिका का घेत नाही? राज्य सरकार गप्प का?, असा संतप्त सवालच संजय राऊत यांनी केला आहे.
बेळगावात 15 टक्के मराठी भाषिक असल्याचा कर्नाटकच्या जनगणनेत अजब निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. कर्नाटक सरकारचा हा संपूर्ण रिपोर्ट खोटा आहे. त्यावर महाराष्ट्र सरकार भूमिका का घेत नाही? राज्य सरकार गप्प का?, असा संतप्त सवालच संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी थेट ठाकरे सरकारलाच घरचा आहेर दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा संताप व्यक्त केला. बेळगावात मराठी माणूस अल्पसंख्याक आहे. बेळगावात 15 टक्के मराठी माणसं आहेत असं कर्नाटक सरकार म्हणत असले तरी ते अत्यंत धादांत खोटं आहे, असंही राऊत म्हणाले.
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी

