Uday Samant | उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट; महाराष्ट्र एक राजकीय संस्कार असलेले….सामंत स्पष्टच बोलले!
शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सावंत यांनी आज सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. भेटीदरम्यान नाट्य परिषदेच्या बैठकीसंदर्भात चर्चा झाली आणि शरद पवार यांच्या आरोग्याबद्दल विचारपूस केली. उदय सावंत यांनी सांगितले की, अजित पवार यांच्या निधनानंतर ही पहिली भेट होती.
शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी आज सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. भेटीदरम्यान नाट्य परिषदेच्या बैठकीसंदर्भात चर्चा झाली आणि शरद पवार यांच्या आरोग्याबद्दल विचारपूस केली. उदय सामंत यांनी सांगितले की, अजित पवार यांच्या निधनानंतर ही पहिली भेट होती. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीबाबत बोलताना त्यांनी म्हटले की, बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, ही एकनाथ शिंदे यांचीही इच्छा आहे. काँग्रेस कशा पद्धतीने पुढे जाते आणि मागे यावर संजय राऊत यांनी बोलले असून, त्याबाबत उदय सावंतांनी अधिक काही बोलले नाही. उदय सामंत यांनी स्पष्ट केले की, जर सुनेत्रा पवार निवडणूक लढवत असतील, तर ती बिनविरोध करणे ही प्रत्येक पक्षाची जबाबदारी आहे. त्यांनी सांगितले की, “राजकारणापेक्षा आपला राजकीय संस्कार पुढे नेणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र हा असा राज्य आहे, जिथे राजकीय संस्काराचे महत्त्व आहे, अशा प्रकारचा संदेश पूर्ण देशभरात जाईल”, असं स्पष्ट वक्तव्य उदय सामंत यांनी केलं आहे.
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?
महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच उत्तर दिलं – मोदी

