AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav thackeray : असे तसे वठणीवर येणार नाहीत हे, 50 खोके घेतलेल्यांकडे... हातात चाबूक घेत ठाकरेंनी सरकारला फटकारलं

Uddhav thackeray : असे तसे वठणीवर येणार नाहीत हे, 50 खोके घेतलेल्यांकडे… हातात चाबूक घेत ठाकरेंनी सरकारला फटकारलं

| Updated on: Oct 11, 2025 | 3:18 PM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष सुरूच आहे. शिंदे यांनी ठाकरेंवर शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण केल्याचा आरोप केला. तर, उद्धव ठाकरे यांनी "५० खोके" घेतलेल्यांकडून शेतकऱ्यांसाठी ५० हजार हेक्टरी मदत मागितली असून, त्यांना वठणीवर आणण्यासाठी कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राजकारण करत असल्याची टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या मुलांच्या हातावर बिस्किटाचा पुडा तरी ठेवला का, असा सवाल शिंदेंनी उपस्थित केला. इतकंच नाहीतर उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडायला लागले आहेत, असे म्हणत शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला. तर हे निव्वळ पुतणा मावशीचे प्रेम असून, शेतकऱ्यांच्या नावावर केलेलं राजकारण असल्याची भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली.

या टीकेला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी “५० खोके” घेतलेल्यांकडे ५० हजार हेक्टरी मागतोय असे म्हटले. उद्धव ठाकरे यांनी पुढे असेही म्हटले की, असे तसे वटणीवर येणार नाहीत. त्यांना वठणीवर आणण्यासाठी हातात चाबूक घ्यावाच लागेल. महाराष्ट्रातील शेतकरी समस्या आणि कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमधील हा शाब्दिक संघर्ष सध्याच्या राजकीय स्थितीचे प्रतिबिंब आहे.

Published on: Oct 11, 2025 03:18 PM