‘पक्षाला गळती कधी लागत नाही, कार्यकर्ते घडत असतात’ : सुनील प्रभू
वरळीतील एका माजी नगरसेवकाने देखील ठाकरे यांचा हात सोडत शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतला. यावर उद्धव ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू आपली प्रतिक्रिया दिली
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला गळती लागली असून अनेक आजी माजी नेते आणि कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जात आहेत. तर वरळीतील एका माजी नगरसेवकाने देखील ठाकरे यांचा हात सोडत शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतला. यावर उद्धव ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पक्षाला गळती लागत नाही. कार्यकर्ते हे घडत असतात. उद्धव ठाकरे यांच्याकडे संघटनात्मक आहे. आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावावरती लाखो कार्यकर्त्यांना एकत्र करत पुन्हा एकदा महाराष्ट्रात चमत्कार घडवू असे म्हटलं आहे. त्याचबरोबर भाजपचे आमदार रमेश पाटील यांनी केलेलं विधान म्हणजे सत्तेचा माज आहे. अती तेथे माती. ज्याप्रमाणे आज हे भाजपचे लोक बोलत आहेत. ते लोकशाहीला घातक आहे. लोक यांना उत्तर मतदानातून देतील.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

