‘कितीही आमदार, खासदार गेले तरी…’, ठाकरे गटानं पुन्हा विरोधकांना फटकारलं, बघा काय केला हल्लाबोल
VIDEO | राज्यात सत्तातंर झाल्यानंतर शिवगर्जना यात्रा जोरदार सुरु, ठाकरे गटानं पुन्हा एकदा ठामपणे विरोधकांना सुनावलं…
रत्नागिरी : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर चिन्ह आणि पक्ष एकनाथ शिंदे गटाकडे गेले. यानंतर ठाकरे गटाची आणि उद्धव ठाकरे यांची रत्नागिरीतील उद्या पहिलीच सभा होणार आहे. त्यामुळे शिवसैनिकांसह संपूर्ण राज्याचे लक्ष या सभेकडे लागले आहे. या सभेविषयी बोलताना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सांगितले की, आमदार आणि खासदार कितीही गेले तरी, खरी शिवसेना ही शिवसैनिकांवर कशी टिकून आहे, हे उद्याच्या या विराट सभेमुळे राज्यातील लोकांना समजणार आहे. तर दुसरीकडे सत्तातंर झाल्यानंतर शिवगर्जना यात्रा जोरदार पणे सुरु आहे. उद्धव ठाकरे यांची पहिल्यांदाच मुंबईबाहेर अशी ही रत्नागिरीत सभा होते आहे त्यामुळे या सभेला शिवसैनिकांची अफाट गर्दी असणार आहे आहे असा विश्वासही अनिल परब यांनी व्यक्त केला आहे. यासह ते असेही म्हणाले की, खरी शिवसेना ही सामान्य शिवसैनिकांवर उभी आहे. त्यामुळे खासदार आणि आमदार गेले तरी आता जी शिवसेना महाराष्ट्रात दिसत आहे.
Published on: Mar 04, 2023 10:02 PM
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
