जय भवानी-जय शिवाजी, जय श्रीराम, हर हर महादेव म्हणत आम्हाला मत द्या, उद्धव ठाकरेंनी का केलं असं आवाहन?
निवडणूक आयोगाने अमित शाह यांच्यासाठी नियम बदलले आहेत का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. तर जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम, हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया म्हणून आम्हाला मतदान करा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी जनतेला करून निवडणूक आयोगाला टोला लगावला आहे.
मुंबई, १६ नोव्हेंबर २०२३ | केंद्रीय निवडणूक आयोगाने अमित शाह यांच्यासाठी नियम बदलले आहेत का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. यासंदर्भातील विचारणा करणारं पत्र उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला लिहिलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अयोध्येतील राम मंदिरासंदर्भात मध्यप्रदेशातील प्रचारसभेत एक वक्तव्य केले होते. अमित शाह यांच्या त्या वक्तव्यावरून विरोधकांनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे. अशातच याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी आयोगाला तसं पत्र लिहिले आहे. आयोगाने त्यांच्या नियमात काही बदल केले असतील तर तसा आम्हालाही प्रचार करता येईल आणि जर बदल केले असतील तर निवडणूक आयोगाने तात्काळ खुलासा करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी आयोगाकडे केली आहे. जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम, हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया म्हणून आम्हाला मतदान करा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी जनतेला करून निवडणूक आयोगाला टोला लगावला आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

