AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात

Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले… सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात

| Updated on: Jun 29, 2026 | 3:07 PM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात नुकत्याच झालेल्या मोठ्या घडामोडीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा सुरू केला आहे. ठाकरे गटातील नऊपैकी सहा खासदारांनी पक्ष सोडत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संघटन बळकट करण्यासाठी कार्यकर्ता मेळाव्यांची मालिका सुरू केली आहे. यवतमाळ, परभणी आणि धाराशिवनंतर आज त्यांनी शिर्डी येथे कार्यकर्त्यांना संबोधित केले.

महाराष्ट्राच्या राजकारणात नुकत्याच झालेल्या मोठ्या घडामोडीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा सुरू केला आहे. ठाकरे गटातील नऊपैकी सहा खासदारांनी पक्ष सोडत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संघटन बळकट करण्यासाठी कार्यकर्ता मेळाव्यांची मालिका सुरू केली आहे. यवतमाळ, परभणी आणि धाराशिवनंतर आज त्यांनी शिर्डी येथे कार्यकर्त्यांना संबोधित केले.

शिर्डीतील मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर टीका करत भाजप आणि शिंदे गटावरही जोरदार निशाणा साधला. राज्य आणि देशात फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

यावेळी त्यांनी शिक्षण आणि शेतकरी प्रश्नांवरही सरकारवर टीका केली. “नीट आणि टीईटीसारख्या परीक्षांचे पेपर फुटत आहेत. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केला जात आहे. दुसरीकडे शेतकरी अडचणीत असताना सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त आहे,” असा आरोप त्यांनी केला.

फुटलेल्या खासदारांचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की, पक्षाचे सहा खासदार गेले असले तरी उर्वरित खासदारांवर त्यांना अभिमान आहे. “ज्यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता पक्षाशी निष्ठा ठेवली, त्यांचा आम्हाला अभिमान आहे. निष्ठा हीच शिवसेनेची खरी ताकद आहे,” असे ते म्हणाले.

तसेच, पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या नेत्यांचे कौतुक करत त्यांनी कार्यकर्त्यांना खचून न जाता नव्या जोमाने पक्षासाठी काम करण्याचे आवाहन केले. “आज परिस्थिती कठीण असली तरी अंधारानंतर उजेड येतोच. शिवसैनिकांनी पुन्हा एकदा वाघासारखे उभे राहण्याची वेळ आली आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या भाषणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना वेग आला असून, त्यांच्या टीकेला भाजप आणि शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jun 29, 2026 03:07 PM

Follow Us