Nashik | गोविंदानंद नाशिक बाहेर न गेल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा
हनुमानाच्या (Hanuman) जन्मस्थळावरुन सुरु झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी नाशिकमध्ये शास्त्रार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण या शास्त्रार्थ सभेत (Shastrartha Sabha) मारुतीराया बाजुलाच राहिला आणि साधु-महंत आपसांत भिडल्याचं चित्र पाहायला मिळालं.
हनुमानजींच्या जन्मस्थानावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील धर्म संसद ठप्प झाली आहे. संतांच्या दोन गटांमध्ये जोरदार वादावादी झाली आणि प्रकरण इतके वाढले की, एका साधूने तेथे ठेवलेल्या पत्रकारांचा माईक घेऊन आयोजकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. नाशिकच्या अजनेरी गावात या धर्मसंसदेची सुरुवातही गदारोळ झाली होती. सुरुवातीला धर्म संसदेत बसण्यावरून संतांमध्ये वाद झाला. किष्किंधा येथे हनुमानाचे जन्मस्थान असल्याचा दावा करणारे या संसदेचे संयोजक महंत गोविंद दास हे भगव्या खुर्चीवर बसले होते. वादविवादात सहभागी होण्यासाठी आलेल्या संतांसाठी जमिनीवर बसण्याची व्यवस्था होती. यामुळे नाशिकचे संत संतप्त झाले आणि त्यांनी त्या धार्मिक संसदेवर बहिष्कार टाकला. नाशिकमधून त्यांची हकासपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
Published on: Jun 01, 2022 10:39 AM
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
