Maharashtra | महाराष्ट्रात कोरड्या हवामानामुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता
राज्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला असून त्यामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात कोरडे वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. येत्या एक-दोन दिवसांत राज्यातील सर्व भागांमध्ये कोरडे हवामान राहील. कोरड्या हवामानामुळे दिवसाच्या कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याचे पुणे वेधशाळेने म्हटले आहे.
राज्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला असून त्यामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात कोरडे वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. येत्या एक-दोन दिवसांत राज्यातील सर्व भागांमध्ये कोरडे हवामान राहील. कोरड्या हवामानामुळे दिवसाच्या कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याचे पुणे वेधशाळेने म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांना काही काळ उष्णतेचा त्रास सहन करावा लागेल.
तत्पूर्वी बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे शनिवारी राज्यातील काही भाग वगळता सर्वत्र पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली होती. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मनाबाद या भागांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या.
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;

