AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Watermelon : हंगामी पिकांनीही शेतकऱ्यांची साथ सोडली, खर्च वाढला अन् कवडीमोल दर मिळाला

3 वर्षापूर्वी महाराष्ट्रातून उत्तरेकडील तसेच पश्चिमेकडील राज्यात महाराष्ट्रातून कलिंगडची निर्यात होत असे. त्यामुळे संपूर्ण हंगाम कलिंगडचे दर टिकून राहत होते शिवाय यामध्ये वाढ होत होती. आता मात्र, उत्तर भारतामध्येही कलिंगडचे उत्पादन घेतले जात आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरच कलिंगड मिळत असल्याने व्यापारी आता राज्यात फरकतही नाहीत अशी अवस्था आहे. मध्यंतरी सण आणि रमजानच्या महिन्यामुळे कलिंगडसह इतर पिकांनाही मागणी होती पण आता चित्र बदलले आहे.

Watermelon : हंगामी पिकांनीही शेतकऱ्यांची साथ सोडली, खर्च वाढला अन् कवडीमोल दर मिळाला
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: May 10, 2022 | 10:20 AM
Share

अकोला : खरीप-रब्बी हंगामातील (Main Crop) मुख्य पिकांवर निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम तर झालाच होता पण पोषक वातावरण आणि मुबलक पाणीसाठा यामुळे हंगामी पिकातून भरपाई काढता येईल म्हणून शेतकऱ्यांनी खरबूज, (Watermelon) कलिंगड यासारख्या हंगामी पिकांची लागवड केली. वातावरणातील बदलाचे संकट टळले असले तरी बाजारपेठेतील (Watermelon Rate) दराचे चढ-उतार शेतकऱ्यांच्या मुळावर आले आहेत. रमजान महिना संपल्यापासून तर कलिंगड कवडीमोलातच विकले जात आहे. शिवाय खरेदीसाठी व्यापारी फिरकत नसल्याने शेतकऱ्यांनाच किरकोळ व्यापारी म्हणून गल्ली-बोळात जाऊन कलिंगडची विक्री करावी लागत आहे. हंगामाच्या सुरवातीला 14 ते 15 रुपये किलो असलेले कलिंगड आता 3 ते 4 रुपये किलो झाले आहे. त्यामुळे गेली दोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव अन् यंदा दरातील लहरीपणा याचा फटका शेतकऱ्यांनाच सहन करावा लागणार आहे.

कलिंगड निर्यात घटली, उत्पादनात वाढ झाली

3 वर्षापूर्वी महाराष्ट्रातून उत्तरेकडील तसेच पश्चिमेकडील राज्यात महाराष्ट्रातून कलिंगडची निर्यात होत असे. त्यामुळे संपूर्ण हंगाम कलिंगडचे दर टिकून राहत होते शिवाय यामध्ये वाढ होत होती. आता मात्र, उत्तर भारतामध्येही कलिंगडचे उत्पादन घेतले जात आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरच कलिंगड मिळत असल्याने व्यापारी आता राज्यात फरकतही नाहीत अशी अवस्था आहे. मध्यंतरी सण आणि रमजानच्या महिन्यामुळे कलिंगडसह इतर पिकांनाही मागणी होती पण आता चित्र बदलले आहे. वाढत्या उन्हामध्येही दर वाढची कोणतेच संकेत दिले गेलेले नाही.त्यामुळे कलिंगड उत्पादक अडचणीत आहेत.

व्यापाऱ्यांनीही फिरवली पाठ

हंगामाच्या सुरवातीला व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावरुन कलिंगडचा दर्जा पाहून खरेदी करीत होता. मात्र, आता परस्थिती बदललेली आहे. उत्पादनात वाढ झाली असून दर निम्म्याने घटलेले आहेत. शिवाय दुसरीकडे डिझेलचे दर वाढले असल्याने वाहतूक खर्चही व्यापाऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे काही दिवस गेल्यानंतर सर्वकाही सुरळीत झाल्यावरच शेतीलाचे दर वाढतील असा अंदाज आहे. सध्याची परस्थिती शेतकऱ्यांच्या नुकासनीची आहे. काही

वातावरण बदलाचा परिणाम नेमका काय?

कमी दिवसांमध्ये अधिकचे पीक पदरी पडते त्यामुळे हंगामी पिकांमध्ये टरबूजाला पसंती दिली जात आहे. गतवर्षी बाजारपेठा बंद असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. तेच भरुन काढण्यासाठी यंदा अधिकच्या क्षेत्रावर कलिंगड लागवड करण्यात आली होती. मात्र, आवक एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली आहे की व्यापारीही कलिंगड घेण्यास धजावत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना विक्रेत्याची भूमिका बजवावी लागत आहे. ठोक बाजारपेठेत केवळ 4 ते 5 रुपये किलो असा दर कलिंगडला मिळत आहे. त्यामुळे मुख्य पिकांमधून तर नुकसान झालेच पण हंगामी पिकांनीही साथ सोडल्याची शेतकऱ्यांची भावना झाली आहे.

Follow Us
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.