AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाव वाढेल या आशेने मागच्या वर्षीचा कापूस अजून घरात, खरीपपुर्व हंगामाच्या पेरणीसाठी…

गेल्या वर्षाचा कापूस विक्रीला झाल्याने कर्ज काढून या वर्षाची लागवड करावी लागत असल्याचं शेतकरी संकटात सापडला आहे. गेल्या वर्षभरात कापसाचा भाव वाढला नाही. सात ते आठ हजारच्या पुढे कापूस न गेल्याने शेतकऱ्यांनी कापसाचा भाव वाढेल या आशेने कपाशी घरात ठेवली आहे.

भाव वाढेल या आशेने मागच्या वर्षीचा कापूस अजून घरात, खरीपपुर्व हंगामाच्या पेरणीसाठी...
मागच्या वर्षीचा कापूस अजून घरातImage Credit source: tv9marathi
| Updated on: May 22, 2023 | 10:29 AM
Share

धुळे : जिल्ह्यात कपाशीची लागवड सुरू झाली आहे .मात्र दुसरीकडे काही शेतकऱ्यांकडे अद्यापही गेल्या वर्षाचा कापूस घरातच पडून आहे. कपाशीला भाव (cotton rate) वाढत नसल्याने, भाव वाढेल या आशेने शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला आहे. कापूस विकून लोकांची देणे दिले जाईल, या आशेने आणि भाव वाढेल या आशेने कापूस घरात ठेवला. मात्र भावाची वाढ न झाल्याने शेतकऱ्यांचा (dhule farmer news) कापूस अद्याप घरात आहे. यावेळी कपाशीची लागवडीला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षाचा कापूस विक्रीला झाल्याने कर्ज काढून या वर्षाची लागवड करावी लागत असल्याचं शेतकरी संकटात सापडला आहे. गेल्या वर्षभरात कापसाचा भाव वाढला नाही. सात ते आठ हजारच्या पुढे कापूस न गेल्याने शेतकऱ्यांनी कापसाचा भाव वाढेल या आशेने कपाशी घरात ठेवली आहे. यासाठी सरकारने पाऊले उचलायला हवी होती. शेतकऱ्यांचे (agricultural news) सरकार म्हणून सरकार गाजावाजा करत असलं, तरी शेताच्या कुठल्याही मालाला भाव नाही. अशी खंत नाना चौधरी यांनी सांगितली.

dhule farmer news

dhule farmer news

कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव बंद

धुळे कृषी उत्पन्न समितीच्या भोंगळ कारभाराचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. गेल्या महिन्याभरामध्ये ही बाजार समिती तीन वेळा म्हणजेच सुमारे आठ दिवस बंद ठेवण्यात आली होती. अचानक कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव बंद ठेवली जात असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पैश्यांची गरज असल्याने ते कांदा विक्रीसाठी अनंत आहेत. मात्र बाजार समिती बंद ठेवले जात असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. बाजार समितीत विक्री झालेला कांदा हा दुसरीकडे न्यायला वाहन भेटत नसल्याचा दावा व्यापाऱ्यांनी करत बाजार समिती बंद ठेवली आहे. व्यापाऱ्यांच्या या हाश्यास्पद कारणामुळे मात्र शेतकरी अडचणीत सापडला आहे. वारंवार बाजार समिती कांदा लिलाव बंद ठेवला जात असल्याने, ही बाजार समिती व्यापाऱ्यांच्या मनमानीसाठी आहे की शेतकऱ्यांच्या सुविधासाठी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आठ दिवसांतून एकदा नळाला पाणी, शेतकरी…

धुळे तालुक्यातील मोर शेवडी या गावात आता पाणीटंचाई भासू लागली आहे. गावात मोठ्या संख्येने पशुपालक आहेत, त्यांच्याकडे असलेल्या जनावरांसाठी आणि स्वतःच्या पिण्याच्या पाण्यासाठी मोठी गरज भासत असते. मात्र गावात नळांना आठ दिवसात एकदा पाणी येतं ते पुरतं नाही. त्यामुळे गावकऱ्यांना आपल्या शेतीतून बैलगाडीद्वारे पाणी आणावे लागते. गावात असलेल्या नळांना सहा ते आठ दिवसानंतर पाणी येत असल्याने पाणीटंचाईचा सामना मोर शेवदी गावातील नागरिकांना करावा लागत आहे. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणीटंचाई भासत असते. गावात मोठ्या संख्येने पशुपालक आहे, प्रत्येक घरी गाई म्हशी असल्याने पाण्याची आवश्यकता भासत असते. मात्र नळाला येणार पाणी पुरत नाही. त्यासाठी गावकऱ्यांना बैलगाडी द्वारे पाणी भरावे लागते. गावाबाहेर असलेल्या विहिरीवरून किंवा शेतकऱ्यांच्या शेतातून गावकरी हे बैलगाडी द्वारे पाणी भरतात. या ठिकाणी तरुण हे पहाटेच बैलगाडी काढून पाणी भरतात. त्यामुळे हे पाणीटंचाई दूर होण्यासाठी शासनाने पर्याय मार्ग सुचवावा अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे.

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.