AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mukesh Ambani: मुकेश अंबानी हे पण शेतकरी? किती एकर शेतीचे मालक, आता शेतात कोणते पीक?

Mukesh Ambani Farmland : जगातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची ओळख इतकीच मर्यादीत नाही. रिलायन्स, जीओसह त्यांनी शेतीतही मोठी भरारी घेतली आहे. हे अनेकांच्या गावी सुद्धा नाही. अनेकांना ही गोष्ट माहिती नाही. किती एकर जमिनीचे ते आहेत मालक?

Mukesh Ambani: मुकेश अंबानी हे पण शेतकरी? किती एकर शेतीचे मालक, आता शेतात कोणते पीक?
मुकेश अंबानी यांनी फुलवली आमराईImage Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 19, 2026 | 11:30 AM
Share

आशियातील आणि जगातील श्रीमंत उद्योगपतींपैकी एक मुकेश अंबानी हे शेतीतही रमतात हे सांगितलं तर अनेकांना धक्का बसेल. त्यांचे शेती प्रेम केवळ खासगी फार्महाऊस पूरतं मर्यादीत नाही. रिलायन्स इंडस्ट्रिजच्या माध्यमातून अंबानी कुटुंबियांची जामनगमध्ये आमराई बहरली आहे. त्याला धीरूभाई अंबानी लखीबाद आमराई या नावाने ओळखले जाते. ही आंब्याची बाग जवळपास 600 एकरमध्ये पसरली आहे. या आमराईमध्ये जवळपास 200 हून अधिक प्रकारचे 1,50,000 पेक्षा जास्त आंब्याची झाडं लावण्यात आली आहे. विशेष म्हणजे इथं रसायनमुक्त शेतीचा प्रयोग आणि पर्यावरण पूरक, नैसर्गिक शेतीवर भर देण्यात येत आहे. या शेतीसाठी पाण्याचे स्त्रोतही बळकट करण्यात आले आहे. या बागेची संपूर्ण गुजरातमध्ये चर्चा आहे.

पडीक आणि क्षारयुक्त जमिनीवर बहरली बाग

गुजरातमधील जामनगर येथे रिलायन्स इंडस्ट्रीचे रिफायनरी कॉम्लेक्स आहे. त्याला लागूनच 1997 मध्ये पर्यावरण जतनासाठी पडीक आणि क्षारयुक्त जमीन विकसीत करण्यात आली. तिथे विविध प्रकारची झाडं कलम करण्यात आली. देशातील विविध वृक्षांनी इथं मूळ धरलं. तर त्यानंतर या पडीक जमिनीवर आमराई बहरली. रिलायन्स इथं वृक्ष लागवड करून हरीत पट्टा तयार केला. जगातील सर्वात आधुनिक आणि समृद्ध अशा आमरायांमध्ये ही सर्वात अग्रेसर आमराई मानली जाते.

प्रदूषण नियंत्रणासाठी हरित पट्टा

जामनगर य़ेथील रिफायनरी प्रकल्प हा महत्त्वाचा आहे. या परिसरात कोणतेही प्रदूषण होऊ नये यासाठी 1997-98 मध्ये इथे वृक्ष लागवड करण्यात आली. त्याचवेळी या परिसरात आमराईची कल्पना पुढे आली आणि त्यादृष्टीने लागवड सुरू झाली. हरित पट्टा तयार करताना आमराई बहरली. या देशभरातून बहुउपयोगी विविध जातीची वृक्ष लागवड करण्यात आली आहे. पडीक आणि क्षारयुक्त जमीन काहीच वर्षात सुपीक ठरली. त्यानंतर आमराई बहरली.

आमराईत 150000 लाखाहून अधिक आंब्याची झाडं

या परिसरात सुरुवातीला जवळपास 100000 आंब्याची झाडं होती. त्यानंतर ही झाडं वाढवण्यात आली. देशभरातूनच नाही तर जगाभऱातील इतर आंब्याच्या जाती कलम करण्यात आल्या. त्यांना इथले पोषक वातावरण मानवले. ही झाडं तरारली. या भागात आंब्याच्या 200 हून अधिक प्रजाती आहेत. या आमराईत केसर, हापूस, लंगडा, चौरा, आम्रपाली आणि रत्नासह इतर अनेक प्रसिद्ध आंबे आहेत.

Follow Us
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड