AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश काय ?

राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने पंचनामा करण्याचे निर्देश दिले असून लवकर मदत जाहीर केली जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटलं आहे.

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश काय ?
Image Credit source: Google
| Updated on: Mar 07, 2023 | 2:20 PM
Share

मुंबई : राज्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे ( Farmer News ) मोठे नुकसान झाले आहे. रब्बीच्या पिके अक्षरशः भुईसपाट झाले आहे. त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. त्यामध्ये सरकारी मदतीची अपेक्षा असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी दखल घेतली आहे. नुकतीच जिल्हाधिकारी यांच्याशी ऑनलाइन संवाद साधून तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले आहे. मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.

शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी आहे. यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे आणि पंचनामे करावेत असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असून स्थानिक पातळीवर तयारी केली जात आहे.

ठाणे, पालघरसह राज्यातल्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. वाशीम, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर परिसरातील अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.

मुंबई, ठाण्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्याने बऱ्याच ठिकाणी आणखी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत.

खरंतर राज्यातील शेतकऱ्यांवर दुसऱ्यांदा हे संकट कोसळले आहे. त्यामध्ये सुरुवातीला खरीप पिकाची दुपार पेरणी त्यानंतर झालेली अतिवृष्टी आणि नंतर आता पुन्हा अवकळी पाऊस आल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. आताही शेतमाल भुईसपाट झाला आहे.

होळी सण साजरा करण्याचा उत्साह एकीकडे असतांना दुसरीकडे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी सर्वच ठिकाणाहून मदतीची मागणी केली जात असतांना सरकारने दखल घेऊन पंचनामा करण्याचे पहिले पाऊल उचलले आहे.

राज्यातील रब्बी पिकांमध्ये गहू हरभरा, कांदा, मका अशी महत्वाची पिकांचा अक्षरशः चिखल झाला आहे. तर द्राक्षबागा संपूर्ण उद्ध्वस्त झाल्या आहेत. जळगाव येथील केळीच्या बागाही जमीनदोस्त झाल्या आहेत. त्यामुळे बळीराजा ऐन सणासुदीच्या काळात मेटाकुटीला आला आहे.

नाशिक, पालघर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर यांसह विविध भागात गरपीठही झाली आहे. त्यामुळे संपूर्ण पीकच निकामी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी आता सरकार पंचनामा करणार असून शेतकऱ्यांना लवकर मदत करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटलं आहे.

Follow Us
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा.
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती....
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती.....
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी.
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती.
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती.
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.