AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जरांगे पाटील यांची मानसिकता तपासली पाहिजेत, लक्ष्मण हाके यांचा जोरदार हल्ला

अजित पवार आणि आमची जरी सामाजिक आणि वैचारिक लढाई असली तरी त्यांचा मृत्यू हा अनाकलनीय घटना आहे. त्या दिवशी दिवसभर मला जेवणही गेले नाही अशी घटना घडायला नको होती असेही लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.

जरांगे पाटील यांची मानसिकता तपासली पाहिजेत, लक्ष्मण हाके यांचा जोरदार हल्ला
manoj jarange patil and laxman hake
| Updated on: Feb 07, 2026 | 8:52 PM
Share

सुनेत्रा ताई पवार यांच्या शपथविधीचे अनेक जण भांडवल करीत आहेत. रोहित पवारांनी अजित पवारांच्या मृत्यूचे भांडवल करण्यापेक्षा त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी समोर येऊन सादर करावेत अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे. तटकरे, मुंडे, भुजबळ, पटेल ही ढेकणे, झुरळे सुनेत्रा पवार यांच्याभोवती फिरताहेत अशी टीका मनोज जरांगे यांनी केली होती. त्याला उत्तर देताना या ढेकणा, झुरळांनी केलंय काय तर अपघातात निधन झालेल्या अजित पवारांच्या पत्नीला उपमुख्यमंत्री केले आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांची मानसिकता तपासली पाहिजे अशीही टीका हाके यांनी केली आहे.

जरांगे पाटील हा शरद पवार, रोहित पवार, बजरंग सोनवणे यांची स्क्रिप्ट वापरतो. तो स्वतःच्या डोक्याने काही बोलत नाही त्यामुळे डोक्याचा भाग कमी असलेला माणूस आहे. त्याच्यावर मी जास्त काही बोलत नाही असेही लक्ष्मण हाके म्हणाले आहेत. सुनेत्राताई पवार यांच्या शपथविधीचे अनेक जण भांडवल करत आहेत. रोहित पवार यांनी अजित पवारांच्या मृत्यूचे भांडवल करण्यापेक्षा त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी समोर येऊन सादर करावेत अशीही मागणी हाके यांनी केली आहे.

प्रसिद्धीसाठी स्टन्ट

बीडच्या खासदाराने मागणी केली असेल तर त्याची चौकशी झालीच पाहिजे, परंतु बजरंग सोनवणे यांनी मागणी करणे म्हणजे एक सनसनाटी ( स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी ) करण्यासाठी केलेली मागणी आहे अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे. सुनेत्रा पवारांच्या शपथविधी वर कोणी कितीही टीका केली असली तरी राजकारणात टायमिंगला महत्त्व असते, जर त्यांनी हा टाइमिंग साधला नसता तर राजकारणात कुस्तीपट्टू म्हणून प्रसिद्ध असलेल्या शरद पवारांनी नक्कीच भाकरी फिरवली असती आणि सुनीत्रा ताईंवर अन्याय झाला असता, असेही मत लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केले आहे.

सुनेत्राताई चांगले राजकारण करतील

सुनेत्राताई राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री झाल्याने त्यांचे स्वागतही केले आहे. अजितदादांपेक्षाही सुनेत्राताई चांगले राजकारण करतील असा ठाम विश्वास असल्याचे हाके यावेळी म्हणाले. आकड्यांचे गणित जुळलं तर शरद पवार साहेब हे राज्यसभेवर जातील, परंतु मला आकड्यांचं गणित जुळेल असे काही वाटत नाही असेही ते म्हणाले.

ओबीसीचे आरक्षण संपवण्याचं काम

दिवसा ढवळ्या ओबीसीचे आरक्षण संपवण्याचं काम सरकारकडून होतं आहे. कोल्हापूर, अहिल्यानगर येथे महापौर पद देतानाही ओबीसीला डावलण्यात आले असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे. पंचायत समितीच्या निवडणुकी या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. मतांचा बाजार मांडला गेला आहे, लोकशाहीचा व्यापार म्हणजे पैशाने मत विकत घेतली जात आहेत.खऱ्या अर्थाने लोकशाहीचा हा अपमान आहे, असं दुर्दैवी चित्र सध्या महाराष्ट्रात सुरू आहे, अशा भाषेत सध्याच्या परिस्थितीवर लक्ष्मण हाके यांनी बोचरी टीका केली आहे.

Follow Us
विद्यार्थ्यांना मोठा झटका.... अचानक नीट परीक्षा रद्द; सीबीआयची एन्ट्री
विद्यार्थ्यांना मोठा झटका.... अचानक नीट परीक्षा रद्द; सीबीआयची एन्ट्री.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांचा पाय आणखी खोलात, ईडीचं समन्स? चौकशी
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांचा पाय आणखी खोलात, ईडीचं समन्स? चौकशी.
महाराष्ट्र पोलिसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, नेमकी घोषणा काय?
महाराष्ट्र पोलिसांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, नेमकी घोषणा काय?.
मोदींच्या आवाहनानंतर राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये; विभागीय बैठका ऑनलाइन
मोदींच्या आवाहनानंतर राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये; विभागीय बैठका ऑनलाइन.
सुवेंदू अधिकारी यांचा मास्टरस्ट्रोक? निवडणूक अधिकाऱ्याचीच या पदावर...
सुवेंदू अधिकारी यांचा मास्टरस्ट्रोक? निवडणूक अधिकाऱ्याचीच या पदावर....
आई तुळजाभवानीच्या चरणी रेकॉर्डब्रेक सोनं; आकडा ऐकूनच व्हाल थक्क....
आई तुळजाभवानीच्या चरणी रेकॉर्डब्रेक सोनं; आकडा ऐकूनच व्हाल थक्क.....
पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप! भाजप सत्तेत येताच मोठी कारवाई; गंभीर..
पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप! भाजप सत्तेत येताच मोठी कारवाई; गंभीर...
आमच्याकडून चूक झाली, यापुढे मी किंवा माझे सहकारी... राज ठाकरे यांचं...
आमच्याकडून चूक झाली, यापुढे मी किंवा माझे सहकारी... राज ठाकरे यांचं....
बेवड्यांचं काही खरं नाही...थलपती विजयची तळीरामांवर वाकडी नजर.....
बेवड्यांचं काही खरं नाही...थलपती विजयची तळीरामांवर वाकडी नजर......
पावसाळ्याआधीच मुंबईकरांच्या घशाला कोरड... पाणी जपून वापरा.....
पावसाळ्याआधीच मुंबईकरांच्या घशाला कोरड... पाणी जपून वापरा......