AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अर्धा जुलै संपला, तरीही पीक कर्ज वाटप रखडलं, बँकांनी हात आखडला!

नाशिक जिल्ह्यात बँकेच्या दारात आजही शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी दररोज खेटे घालावे लागत आहेत. जुलैचा पंधरवडा उजाडला तरी जिल्ह्यात खरिप पीक कर्जवाटप 50 टक्केही झालेलं नाही.

अर्धा जुलै संपला, तरीही पीक कर्ज वाटप रखडलं, बँकांनी हात आखडला!
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 14, 2021 | 3:02 PM
Share

नाशिक : मंत्रिमोहदय शेतकऱ्यांच्या पीक कर्जाबाबत (Crop loan) भल्याभल्या घोषणा करत आहेत. मात्र दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात बँकेच्या दारात आजही शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी दररोज खेटे घालावे लागत आहेत. जुलैचा पंधरवडा उजाडला तरी जिल्ह्यात खरिप पीक कर्जवाटप 50 टक्केही झालेलं नाही. एकूण 2 हजार 780 कोटी उद्दिष्टापैकी फक्त 1 हजार 161 कोटीचं पीक कर्ज वाटप बँकांनी केलं आहे. त्यात जिल्हा बँकेने 71 टक्के कर्जवाटप केले आहे. तर, खासगी आणि ग्रामीण बँकांनी जेमतेम 30 टक्क्यांच्या आसपास कर्जवाटप केले असून, शेतकर्‍यांना कर्जवाटपास हात आखडता घेतला आहे.

जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली आहे. जून महिना कोरडाठाक गेला असून, जुलै महिन्याच्या प्रारंभीही पावसाने शेतकर्‍यांची निराशाच केली. दमदार पावसाअभावी जिल्ह्यात जेमतेम 14 टक्के पेरण्या झाल्या आहेत. पावसाच्या दांडी यात्रेमुळे शेतकर्‍यावर दुबार पेरणीची टांगती तलवार आहे. त्यात पीक कर्ज वाटपात बँकांनी आखडता हात घेतल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.

बँकांची टाळाटाळ

बी बियाणे, खते पेरणीपूर्व तयारीसाठी शेतकर्‍यांना आर्थिक मदतीची गरज असताना, बँकाकडून शेतकर्‍यांना सढळ हाताने कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. तर राष्ट्रीयकृत, खासगी , ग्रामीण बँका कर्ज वाटपात पिछाडीवर असून, सढळ हाताने कर्ज देत नसल्याचा आरोप शेतकर्‍यांकडून केला जात आहे. एकीकडे वरुण राजाच्या अवकृपेमुळे दुबार पेरणीचे संकट, दुसरीकडे बँकेकडून कर्ज देण्यास केली जाणारी टाळाटाळ, यामुळे बळीराजाची दोन्ही बाजूकडून कोंडी झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात किती पीककर्ज वाटप?

बँकनिहाय पीककर्ज वाटप

जिल्ह्यात एकूण उद्दिष्ट – २ हजार ७८० कोटी

१) राष्ट्रीयकृत बँक

– उद्दिष्ट – १ हजार ८७२ कोटी – वाटप – ६७६ कोटी – ३६ टक्के

२) खासगी बँक – उद्दिष्ट – ३६५ कोटी – वाटप – १०१ कोटी – २७ टक्के

३) ग्रामीण बँक – उद्दिष्ट – ८ कोटी – वाटप – २ कोटी – ३२ टक्के

४) जिल्हा बँक – उद्दिष्ट- ५३५ कोटी – वाटप – ३८२ कोटी – ७१ टक्के

या महिनाअखेरपर्यंत कर्ज पूर्ण वाटप होईल असं बँकेकडून सांगण्यात येतंय. मात्र शेतकऱ्यांचा आर्थिक विचार करता त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. अन्यथा आधीच कोरोनाच्या संकटात सापडलेला बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडेल.

संबंधित बातम्या 

पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची परवड सुरुच, राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकाच्या भूमिकेमुळे शेतकरी संतप्त

शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही अशी तक्रार आली नाही पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी दरडावलं

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक