AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lumpy : शेतकऱ्यावर लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी बैल जोडी विकण्याची वेळ, किंमती कमी झाल्यामुळे शेतकरी चिंतेत

लम्पी आजार उद्धभल्यापासून अनेक जिल्ह्यात जनावरांचा बाजार बंद करण्यात आला होता. त्याचबरोबर जनावरांची काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यातं आलं होतं.

Lumpy : शेतकऱ्यावर लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी बैल जोडी विकण्याची वेळ, किंमती कमी झाल्यामुळे शेतकरी चिंतेत
Lumpy skin diseaseImage Credit source: tv9marathi
| Updated on: Feb 01, 2023 | 7:51 AM
Share

धुळे : धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Dhule Agricultural Produce Market Committee)शेतकऱ्यांच्या (Farmer) बैलांना अर्ध्या किमतीत विकण्याची वेळ आली आहे. घरात असलेली बैलजोडी कमी भावामुळे विकता येत नाही. तर लग्नासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पैशांची गरज असल्याने बैल जोडी विकावी लागते आहे. लम्पी (Lumpy skin disease) या आजारामुळे जनावरांच्या किमती सु्द्धा कमी झाल्या आहेत. त्यामुळे कर्जबाजारी शेतकरी चिंताग्रस्त असल्याची माहिती मिळाली आहे. लम्पी आजार आल्यापासून सगळ्याचं जनावरांच्या किमती कमी झाल्या आहेत, त्यामुळे शेतकरी सुध्दा हतबल झाले आहेत.

शेतकऱ्यांना लम्पी आजाराच्या बंद नंतर बैलांची जोडी अर्ध्या किमतीत विकायची वेळ आली आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बैलांच्या किमती कमी झाल्या आहेत. व्यापारी हे सुमारे दीड लाख रुपयाची बैलाची जोडी अर्ध्या किमतीत मागत आहेत, बैलाला भाव नाही. लम्पी आजाराच्या बाजार बंद नंतर ही परिस्थिती उद्भभली आहे. पैसे हवे असल्याने अवघ्या 80 हजार रुपयात ही जोडी विकावी लागत आहे. सर्वच बैलांच्या किमती या विकताना कमी किंमतमध्ये विकावे लागल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतो आहे.

लम्पी आजार उद्धभल्यापासून अनेक जिल्ह्यात जनावरांचा बाजार बंद करण्यात आला होता. त्याचबरोबर जनावरांची काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यातं आलं होतं. ज्या जनावरांना लम्पी आजार झाला आहे, त्यांच्या उपचारासाठी राज्य सरकारने विविध सेंटर सुध्दा तयार केली होती.

मुंबईच्या रुईया कॉलेज परिसरात ग्रंथोत्सव 2026 ला सुरुवात
मुंबईच्या रुईया कॉलेज परिसरात ग्रंथोत्सव 2026 ला सुरुवात.
विलिनीकरण होणार की नाही? अनिल देशमुख स्पष्टच बोलले
विलिनीकरण होणार की नाही? अनिल देशमुख स्पष्टच बोलले.
राज्यातील एक सुजलाम सुफलाम जिल्हा दाखवा; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
राज्यातील एक सुजलाम सुफलाम जिल्हा दाखवा; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल.
राज्य मागे पडले; शेतकरी, बेरोजगारी, गुंतवणूक..वडेट्टीवार सरकारवर बरसले
राज्य मागे पडले; शेतकरी, बेरोजगारी, गुंतवणूक..वडेट्टीवार सरकारवर बरसले.
विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध
विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध.
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय?राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय?राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर.
चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर...
चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर....
भरधाव कारच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू; नागपूरमधील दुर्दैवी घटना
भरधाव कारच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू; नागपूरमधील दुर्दैवी घटना.
मुंबई-विजयदुर्ग सागरी रो रो सेवा 1 मार्चपासून सुरू होणार
मुंबई-विजयदुर्ग सागरी रो रो सेवा 1 मार्चपासून सुरू होणार.
एकनाथ शिंदे 2 दिवसांपासून विश्रांतीसाठी दरे गावात
एकनाथ शिंदे 2 दिवसांपासून विश्रांतीसाठी दरे गावात.