AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या जिल्ह्यात शेती साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी, पेरणीच्या कामांना वेग येणार

महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात मागच्या चार दिवसांपासून समाधानकारक पाऊस सुरु झाला आहे. महाराष्ट्रात पाऊस उशिरा सुरु झाल्याने भाजीपाला ७० ते ८० रुपयाने महागला आहे.

या जिल्ह्यात शेती साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी, पेरणीच्या कामांना वेग येणार
maharashtra rain updateImage Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jun 29, 2023 | 9:50 AM
Share

धुळे : धुळे जिल्ह्यात (dhule) मागच्या काही दिवसात मध्यम आणि हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरु (maharashtra rain update) झाला आहे. त्यामुळे वातावरणात चांगलाचं गारवा निर्माण झाला आहे. शेतीच्या कामासाठी लागणारे साहित्य शेतकरी खरेदी करीत आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बोगस बियाणे (bogus seeds) सापडल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. खात्री केल्याशिवाय बिगाणे आणि खते घेऊ नये असं आवाहन शेतकऱ्यांनी केलं आहे. सध्या धुळे जिल्ह्यात पाऊस सुरु झाल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीचे बियाणे खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे.

शेतकऱ्यांमध्ये पेरणीसाठी लगबग सुरू

दोन दिवसांपासून थोडा पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. शेतीसाठी लागणाऱ्या शेती साहित्याची खरेदी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतीसाठी लागणारे साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. शेतीसाठी पासे, कुराड खुरपे, वीळा पावडे त्याचबरोबर आदी साहित्याची गरज लागत असते. सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे. थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला असून येत्या काळात चांगला पाऊस होईल आणि शेतीकामांसाठी साहित्याची गरज लागणार असल्याने शेतकरी शेती साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी करू लागला आहे.

धुळे शहरात पाऊस लांबल्याने भाजीपाल्याचे चांगलेचं वाढले आहेत. गेल्या आठवड्यात 20 ते 30 रुपये किलोने भेटणारा भाजीपाला तब्बल 100 रुपये किलोपर्यंत बाजारात मिळतोय, त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. जून महिना संपला तरी, समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे धुळे शहरात भाजीपाल्याचे दर गग्नाला भिडले आहेत. गेल्या आठवड्यात 20 ते 30 रुपये किलोने भेटणारा भाजीपाला हा आता तब्बल 100 रुपयांच्यावरती गेला आहे. तीस रुपये किलो भेटणारी कोथिंबीर 160 रुपये किलो, दहा रुपये किलो भेटणारे टमाटे 80 रुपये, गिलके 80 मिरची 100 रुपये,अद्रक 120, वांगी 80 किलो दराने मिळत आहे. सध्या शहरालगत असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकवला जातो. मात्र पाऊस नसल्याने गावांमधील भाजीपाल्याची आवक घटली आहे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...