AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समुद्र खवळला, आज दुपारनंतर किनारपट्टी भागात मोठ्या लाटांची शक्यता

महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आज रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्याला आजही ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. सध्या भरतीच्या लाटांना सुरुवात झाली आहे.

समुद्र खवळला, आज दुपारनंतर किनारपट्टी भागात मोठ्या लाटांची शक्यता
maharashtra rain updateImage Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jun 29, 2023 | 8:39 AM
Share

मुंबई : महाराष्ट्रात (maharashtra rain update) आज अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची (today heavy rain) शक्यता आहे. मागच्या चार दिवसांपासून महाराष्ट्रात मुंबईसह अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. चार दिवसांपासून सततधार असल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदात आहे. काही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. तर काही शेतकरी पावसाच्या विश्रांतीची वाट पाहत आहेत. मागच्या दोन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट (orange alert kokan) जारी करण्यात आला आहे. आज मुसळधार पावसाची (Maharashtra Mumbai Rains IMD Updates) शक्यता आहे. समुद्र किनारपट्टी आणि नदी किनारी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रात्री जोरदार पाऊस झाला आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण असून पावसाने विश्रांती घेतली असल्याची माहिती मिळाली आहे. समुद्र खवळला असून आज दुपारनंतर किनारपट्टी भागात मोठ्या लाटांची शक्यता आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने दिलासा दिला आहे. रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणात पाण्याची पातळी पूर्णपणे खालावलेली आहे. रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणात केवळ ७ टक्केच पाणी साठा शिल्लक आहे. सध्याच्या पावसामुळे पाण्याची समस्या काही प्रमाणात सुटली आहे.

मागच्या चार दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे राजापूरातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे. आता राजापूर शहराल पाण्याचा सुरळीत पुरवठा केला जाणार असल्याची माहिती नगरपरिषदेने जाहीर केली आहे. राजापूर शहराला दोन दिवस आड पाणी पुरवठा केला जात होता. राजापूर शहराला पाणी पुरवठा करणारे धरणात पुरेसा पाणीसाठा झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं नगरपरिषदेने जाहीर केलं होतं.

मुंबईत काल दुपारपासून पावसाचा जोर वाढला आहे. रात्री मुंबईत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. सकाळपासून अधून मधून पावसाच्या सरी सुरु आहेत. ढगाळ वातावरण असल्यामुळे कधीही पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कालच्या पावसानंतर मुंबई उपनगरातील अनेक सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे आज प्रशासन आणि महापालिकेचे कर्मचारी सतर्क ठेवले आहेत. सध्या अंधेरीसह उपनगरात आता पाऊस बंद आहे. अंधेरीचा भुयारी मार्ग सध्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला आहे. कालच्या पावसाने पाणी तुंबल्याने हा भुयारी मार्ग काही तासांसाठी बंद करण्यात आला होता.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती