AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समुद्र खवळला, आज दुपारनंतर किनारपट्टी भागात मोठ्या लाटांची शक्यता

महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आज रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्याला आजही ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. सध्या भरतीच्या लाटांना सुरुवात झाली आहे.

समुद्र खवळला, आज दुपारनंतर किनारपट्टी भागात मोठ्या लाटांची शक्यता
maharashtra rain updateImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 29, 2023 | 8:39 AM
Share

मुंबई : महाराष्ट्रात (maharashtra rain update) आज अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची (today heavy rain) शक्यता आहे. मागच्या चार दिवसांपासून महाराष्ट्रात मुंबईसह अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. चार दिवसांपासून सततधार असल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदात आहे. काही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. तर काही शेतकरी पावसाच्या विश्रांतीची वाट पाहत आहेत. मागच्या दोन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट (orange alert kokan) जारी करण्यात आला आहे. आज मुसळधार पावसाची (Maharashtra Mumbai Rains IMD Updates) शक्यता आहे. समुद्र किनारपट्टी आणि नदी किनारी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रात्री जोरदार पाऊस झाला आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण असून पावसाने विश्रांती घेतली असल्याची माहिती मिळाली आहे. समुद्र खवळला असून आज दुपारनंतर किनारपट्टी भागात मोठ्या लाटांची शक्यता आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने दिलासा दिला आहे. रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणात पाण्याची पातळी पूर्णपणे खालावलेली आहे. रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणात केवळ ७ टक्केच पाणी साठा शिल्लक आहे. सध्याच्या पावसामुळे पाण्याची समस्या काही प्रमाणात सुटली आहे.

मागच्या चार दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे राजापूरातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे. आता राजापूर शहराल पाण्याचा सुरळीत पुरवठा केला जाणार असल्याची माहिती नगरपरिषदेने जाहीर केली आहे. राजापूर शहराला दोन दिवस आड पाणी पुरवठा केला जात होता. राजापूर शहराला पाणी पुरवठा करणारे धरणात पुरेसा पाणीसाठा झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं नगरपरिषदेने जाहीर केलं होतं.

मुंबईत काल दुपारपासून पावसाचा जोर वाढला आहे. रात्री मुंबईत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. सकाळपासून अधून मधून पावसाच्या सरी सुरु आहेत. ढगाळ वातावरण असल्यामुळे कधीही पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कालच्या पावसानंतर मुंबई उपनगरातील अनेक सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे आज प्रशासन आणि महापालिकेचे कर्मचारी सतर्क ठेवले आहेत. सध्या अंधेरीसह उपनगरात आता पाऊस बंद आहे. अंधेरीचा भुयारी मार्ग सध्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला आहे. कालच्या पावसाने पाणी तुंबल्याने हा भुयारी मार्ग काही तासांसाठी बंद करण्यात आला होता.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...