AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या जिल्ह्यात 4 लाख 5 हजार हेक्टरवरील पेरणी रखडली, चिंताग्रस्त शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता

ज्या शेतकऱ्यांनी विहीरीचं पाणी असल्यामुळे कपाशीची लागवड केली होती. ते शेतकरी सध्या चांगलेचं अडचणीत आले आहेत. पुढच्या आठवड्यात पाऊस झाला नाहीतर, पीक करपून जाण्याची शक्यता आहे.

या जिल्ह्यात 4 लाख 5 हजार हेक्टरवरील पेरणी रखडली, चिंताग्रस्त शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता
washim farmerImage Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jun 19, 2023 | 9:58 AM
Share

वाशिम : वाशिम (washim) जिल्ह्यात जूनचा तिसरा आठवडा संपत आला, तरी अद्याप महाराष्ट्रात (maharashtra news) मान्सून दाखल न झाल्याने खरिपाच्या 4 लाख 5 हजार हेक्टर वरील सोयाबीन सह इतर पिकांच्या पेरण्या रखडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जर येत्या आठवड्यात पाऊस न पडल्यास पाण्या अभावी लागवड केलेली कपाशी जळून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अनेक शेतकरी (agricultural news in marathi) चिंताग्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे

4 ते 5 दिवस पाऊस पडला नाही, तर…

वाशिम जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या 4 लाख 5 हजार हेक्टरवर करण्याचे कृषी विभागाचे नियोजन आहे. यंदा जूनचा तिसरा आठवडा संपत आला, तरी पाऊस न पडल्याने खरिपाच्या सोयाबीन, तूर, मूग यासह विविध पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. जिल्ह्यातील 28 हजार हेक्टर प्रस्तावित क्षेत्रापैकी सिंचनाची सोय असलेल्या 758 हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. विहीरींनी तळ गाठल्याने या कपाशीला पाणी देणे शक्य नाही. “त्यामुळे कपाशीचे पीक करपत चालले आहे. त्यातच जर येत्या 4 ते 5 दिवस पाऊस पडला नाही, तर लागवड झालेली कपाशी ही जळून जाण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तसेच उशिरा पाऊस पडल्यास कपाशीचा पेरा ही घटण्याची शक्यता आहे अशी माहिती कापूस उत्पादक शेतकरी सलामत अली, धनराज उंटवाल यांनी दिली.

उशिरा जर पडला तर…

वाशिम जिल्ह्यात यंदा खरिपाच्या 4 लाख 5 हजार हेक्टर पैकी 3 लाख 3 हजार हेक्टर वर सोयाबीन, 62 हजार हेक्टरवर तूर, 28 हजार हेक्टरवर कपाशी, 3 हजार हेक्टरवर मूग, 3 हजार हेक्टर वर उडीद पेऱ्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. वाशिम जिल्ह्यात अद्याप मान्सून दाखल झाला नाही. जोपर्यंत 75 ते 100 मिली मीटर पाऊस पडत नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांनी कोणतीही पेरणी करू नये. मान्सून उशिरा जर पडला तर सोयाबीनचे लवकर येणारे वाण पेरण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. त्याचबरोबर गणेश गिरी, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.

Follow Us
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
Dhiraj Seth | भारतीय लष्कराला नवे सेनाप्रमुख! 40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ; नेमकं काय सांगितलं?