AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur : मुदतवाढीनंतरही अतिरिक्त उसाचा धसका कायम, काय आहेत कारणे ?

आतापर्यंत ऊस तोडणीचे कामे उरकून घेण्यासाठी उसतोड कामगारांबरोबर फडात हार्वेस्टरही असायाचे. आता मे महिन्यात ऊस तोड कामगारांचा आणि टोळीवाल्यांचा करार हा संपला आहे. त्यामुळे ते परतीच्या वाटेवर आहेत तर आता केवळ हार्वेस्टरचा वापर केला जात आहे. कोरड्या क्षेत्रावर हार्वेस्टरने अधिकची ऊसतोडणी होते पण हलक्या स्वरुपाचा देखील पाऊस झाला तरी ऊस तोडणी करता येत नाही.

Latur : मुदतवाढीनंतरही अतिरिक्त उसाचा धसका कायम, काय आहेत कारणे ?
जून महिना उजाडला ती लातूर जिल्ह्यामध्ये अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Jun 02, 2022 | 3:24 PM
Share

लातूर : दरवर्षी मे महिन्यात बंद होणारे (Sugar Factory) साखर कारखान्यांचे धुराडे यंदा जून महिना उजाडला तरी सुरुच आहे. यामागे अनेक कारणे असली तरी आता अतिरिक्त (Sugarcane) उसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जी मुदतावाढ ठरवून देण्यात आली आहे त्या दरम्यानही (Surplus Sugarcane) अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लागतो की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. 10 जूनपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर मात्र, पावासामुळे कारखाने सुरु ठेवता येणार नाहीत. त्यामुळे 10 जूनपर्यंत किती क्षेत्रावरील उसाचे गाळप होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पावसाची चाहूल लागताच बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान असते यंदा मात्र, ऊस उत्पादकांवर चिंतेच ढग कायम असल्याचे चित्र लातूर जिल्ह्यात पाहवयास मिळत आहे.

उसतोड कामगारांचा करार संपला

दरवर्षी ऑक्टोंबर महिन्यात सुरु झालेला गाळप हंगाम हा मे महिन्यापर्यंत सुरु असतो. यंदा मात्र अतिरिक्त उसामुळे हंगाम लांबणीवर पडला आहे. आतापर्यंत ऊसतोड कामगारही फडात होते पण मे महिन्यातच त्यांचा करार संपल्याने त्यांनी परतीची वाट धरली आहे. शिवाय मध्यम स्वरुपाचा जरी पाऊस झाला तरी ऊसतोडणी शक्य होत नाही. त्यामुळे ऊसतोड कामगार गावाकडे परतत आहेत. तर काही कारखान्यांच्या टोळ्या गावी परतल्याही. लातूर जिल्ह्यात या हंगामात 13 पैकी 10 साखर कारखाने हे सुरु होते. शिवाय क्षमतेपेक्षा अधिकेचे गाळप करुनही अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम राहिलााच.

आता मदार हार्वेस्टरवर

आतापर्यंत ऊस तोडणीचे कामे उरकून घेण्यासाठी उसतोड कामगारांबरोबर फडात हार्वेस्टरही असायाचे. आता मे महिन्यात ऊस तोड कामगारांचा आणि टोळीवाल्यांचा करार हा संपला आहे. त्यामुळे ते परतीच्या वाटेवर आहेत तर आता केवळ हार्वेस्टरचा वापर केला जात आहे. कोरड्या क्षेत्रावर हार्वेस्टरने अधिकची ऊसतोडणी होते पण हलक्या स्वरुपाचा देखील पाऊस झाला तरी ऊस तोडणी करता येत नाही. अनेक ठिकाणी हार्वेस्टर अडकून राहत आहेत. यातच गेल्या 8 दिवसांपासू वातारणात बदल झाला असून जिल्ह्यात अनेत ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. उसतोड कामगार परतले आणि हार्वेस्टरचा असा हा वापर यामुळे अतिरिक्त उसाचा अतिरिक्त प्रश्न कायम राहणार.

शिल्लक ऊसाला एकरी 1 लाख रुपयांची मागणी

लातूर जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र हे दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय मांजरा नदीकाठच्या परिसराला तर ‘ग्रीन बेल्ट’ असेच संबोधले जाते. मात्र, यंदा या बेल्टला नजर लागली ती अतिरिक्त उसाची. प्रशासनाकडून ऊस तोडणीबाबत एक ना अनेक उपया समोर आले पण प्रभावीपणे राबवताच आला नाही. त्यामुळे जिल्ह्यातच नव्हे तर सबंध मराठवाड्यात अतिरिक्त ऊस हा राहणारच आहे. त्यामुळे शिल्लक ऊस राहिलाच तर सरकारने शेतकऱ्यांना एकरी एक लाखाची मदत करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते सत्तार पटेल यांनी केली आहे.

Follow Us
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल