AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik : निफाड तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटात, बिबटे पकडण्यासाठी पिंजऱ्याची संख्या वाढवण्याची मागणी

निफाड तालुक्यातील शेतकरी बिबटे आणि लोडशेडिंग अश्या दुहेरी संकटात, वनविभागाने बिबटे पकडण्यासाठी पिंजऱ्याची संख्या वाढवावी...

Nashik : निफाड तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटात, बिबटे पकडण्यासाठी पिंजऱ्याची संख्या वाढवण्याची मागणी
बिबट्याImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Feb 09, 2023 | 2:52 PM
Share

उमेश पारीक, निफाड : कृषी प्रधान निफाड (nashik nifad) तालुक्यातील शेतकरी (farmer) दुहेरी संकटात सापडला आहे. बिबट्यांची संख्या (leopard number) अधिक वाढली आहे. त्यामुळे बिबट्याचा मुक्त संचार शेतकऱ्यांना पाहायला मिळत आहे. मोकाट जनावरांबरोबर मानवावर वारंवार हल्ले होत आहेत, तर दुसरीकडे रात्री मिळणाऱ्या लाईटमुळे शेतीला पाणी देण्यासाठी रात्री शेतात जावे लागते. बिबट्यांच्या भीतीमुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. वनविभागाने पिंजऱ्यांची संख्या वाढवत निफाड तालुक्यातील गावे बिबटमुक्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथे द्राक्ष बागेच्या कामावरून शेतमजूर परत येत असताना आई-वडिलांच्या देखत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करत सात वर्षाच्या चिमुकल्याला उचलून नेत मक्याच्या शेतात ठार केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर मादी बिबट्याला जेरबंद करण्यात आले, पण त्या ठिकाणी बिबट्याचे कुटुंब राहत आहे. नर बिबट्या आणि दोन बछडे असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून येथील स्थानिक शेतकरी शेतात काम करण्यासाठी दिवसा जाण्यास घाबरत आहेत अशी माहिती दत्तू शिवराम मुरकुटे यांनी दिली.

तर लोडशेडिंग मुळे रात्रीची लाईट मिळत असल्याने शेतीला पाणी द्यावे कसे सर्व शेतीची कामे ठप्प होत असल्याने या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात पिंजरे लावावे तसेच दिवसा लाईट द्यावी अशी मागणी येथील स्थानिक शेतकरी सह त्यांचे कुटुंबीय करत असल्याचं रामनाथ माधव मुरकुटे यांनी दिली आहे.

निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथे बिबट्यांच्या भीतीमुळे अक्षरशः शेतात काम करायला जाण्यासाठी जोडीला कोणीतरी असल्याशिवाय कोणी जात नाही. चार-पाच लोक शेतात काम करीत असले तरंच लोकं शेतात कामासाठी जात आहेत. वन विभागाने या ठिकठिकाणी जास्तीत जास्त पिंजरे लावावे व बिबट्यांना जेरबंद करावे अशी मागणी कविता संजय मुरकुटे यांनी केली आहे.

Follow Us
‘स्कूल ठीक करो’ मोहिमे अंतर्गत CJP पदाधिकारी आणि दादा भुसे यांची भेट
मंत्री दादा भुसे आणि कॉकरोच जनता पार्टीची भेट
OBC आश्रमशाळांना इशारा; मूलभूत सुविधा न दिल्यास मान्यता रद्द
राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट