AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | बळीराजाला अवकाळीचा पुन्हा तडाखा , काढणीला आलेली पिकं मातीमोल

अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या गहू, हळद, हरभरा, ज्वारी,भाजीपाला या पिकांचं नुकसान झालंय. crops lost unseasonal rains

Video | बळीराजाला अवकाळीचा पुन्हा  तडाखा , काढणीला आलेली पिकं मातीमोल
अवकाळी पावसानं शेतीचं नुकसान
| Updated on: Mar 20, 2021 | 6:10 PM
Share

मुंबई: शेतकऱ्यांवरील संकट काही थांबत नसल्याचं चित्र आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. त्यासोबतच खरीप हंगाम काढणीला आलेला असताना अतिवृष्टी, महापूर यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. आज राज्यातील नाशिक, बुलडाणा, वाशिम, अमरावतीमध्ये  वर्धा परभणी, चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. ( Nashik Buldana Washim Wardha Parbhani and Chandrapur Farmers lost crops due to unseasonal rains)

नाशिकच्या निफाडमध्ये द्राक्ष उत्पादकांचं नुकसान

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने द्राक्षांना बाजार भाव मिळत नसल्यामुळे आधीच चिंताग्रस्त असलेल्या द्राक्ष उत्पादकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. अचानक आलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत, आहेरगाव पालखेड या गावातील परिसरातील जोरदार हजेरी लावली. काढणीला आलेल्या द्राक्ष, गहू व कांदा पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे बळीराजा पुन्हा आर्थिक संकटात सापडला.

परभणीच्या सोनपेठ तालुक्याला गारपीटीचा तडाखा

परभणीच्या सोनपेठ तालुक्यात गारपीटीचा तडाखा बसलाय. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या गहू, हळद, हरभरा, ज्वारी,भाजीपाला या पिकांचं नुकसान झालंय. हवामान विभागाने राज्यात तीन दिवस अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर परभणी जिल्ह्यातील पालम,पूर्णा, गंगाखेड भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सोनपेठ तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा वर्षाव झालाय. निळा वंदन आणि उखळी गाव परिसरात बोराच्या आकाराच्या गारा कोसळलेल्या, यामुळे शेती पिकांचं नुकसान झालंय,परिसरातील शेतकऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी सरकारकडे केलीय.

वर्धा जिल्ह्यात आर्वी तालुक्यात मोठ नुकसान

वर्धा जिल्ह्यात दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि वादळानं मोठं नुकसान झालंय. यात संत्रा, गहू, चणा, भाजीपाला, फळ पिकांच अतोनात नुकसान झालंय.आर्वी तालुक्यात वीज पडून एका जनावराचा मृत्यू झालाय. गुरुवारी, शुक्रवारी वर्धा जिल्ह्यात आर्वी, कारंजा भागाला वादळाचा जोरदार तडाखा बसला. शुक्रवारी रात्रीदेखील जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात विजांचा कडकडाट, वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. प्राथमिक माहितीनुसार वादळामुळे आर्वी तालुक्यात ५ घरे, २ गोठ्यांचे, कारंजा तालुक्यात एका घराचे नुकसान झालंय.

शासकीय यंत्रणेकडून नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. अनेकांचा गहू, चणा काढणीला आला असून अचानक आलेल्या पाऊस आणि वादळात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळामुळे काही भागात वीज पुरवठा तात्पुरता खंडित झाला होता.

वाशिममध्येही गहू, हरभऱ्याचं मोठं नुकसान

वाशिम जिल्ह्यात काल रात्री झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीने शिरपूर, चिखली सह अनेक गावात गहू,हरभरा, कांदाबीज,पपई,टरबूज, केळी सह भाजीपाला पिकांच प्रचंड नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे.त्यामुळं जिल्हा प्रशासनाने नुकसान झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

वाशिम जिल्ह्यात खरिपातील सोयाबीन नंतर रब्बीत मोठ्या प्रमाणात कांदाबीज लागवड करतात. कांदाबीज काढणीला आला असताना काल रात्री गारपीट सह अवकाळी पावसामुळे 100 टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळं गारपिटीने झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून भरीव मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

संबंधित बातम्या:

Special Report: महाराष्ट्रावर लॉकडॉऊनचे ढग? चांद्यापासून ते बांद्यापर्यंत 15 शहरं अ‍ॅलर्टवर; वाचा सविस्तर!

मरावाड्यात कोरोनाता वाढता धोका, औरंगाबाद आणि परभणीत प्रशासनाकडून महत्वाचे निर्णय

( Nashik Buldana Washim Wardha Parbhani and Chandrapur Farmers lost crops due to unseasonal rains)

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.