AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solapur : आता सार्वजनिक जागांवरही फळबाग लागवडीचे उद्दीष्ट, सोलापूर जिल्हा परिषदेचा काय आहे उपक्रम?

केवळ शेतकऱ्यांनीच फळबागेतून उत्पन्न घ्यावे असे नाही तर सार्वजनिक ठिकाणी जिथे जागा उपलब्ध आहे त्या क्षेत्रात फळबाग लागवड केली जाणार आहे. यामध्ये गायरान, गावठाण, शासकिय, निमशासकीय जमिन, सामूहिक जमिन, शैक्षणिक संस्थांची जमिनावर हा उपक्रम राबवला जाणार आहे. याबाबत स्थानिक पातळीवर सूचना देण्यात आल्या असून आता लागवड झाली तर पुढे पावसाळ्यात ही फळझाडे टिकून राहणार आहेत.

Solapur : आता सार्वजनिक जागांवरही फळबाग लागवडीचे उद्दीष्ट, सोलापूर जिल्हा परिषदेचा काय आहे उपक्रम?
| Updated on: May 04, 2022 | 9:37 AM
Share

सोलापूर : उत्पादन वाढीसाठी केवळ शेतकरीच प्रयत्नशील आहेत असे नाही तर (Government) शासकिय स्तरावरही वेगवेगळे उपक्रम राबवून उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न केले जातात. सोलापूर (Solapur Zilha Parshad) जिल्हा परिषद व पंचायत समितीला 60 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सार्वजनिक जागांवर फळबाग लागवड करण्याची मोहिमच जिल्हा परिषदेने हाती घेतली आहे. यामुळे आर्थिक उत्पन्न तर वाढणार आहे पण (Orchard) फळरोपांच्या लागवडीने परिसर हा वृक्षाच्छादित होणार आहे. यासाठी ग्रामपंचायतींचा सहभाग महत्वाचा आहे. फळबागामुळे उत्पादनात तर वाढ होणार आहेच शिवाय वृक्षलागवडीचे उद्दीष्टही साध्य होणार आहे. 1 मे पासून या उपक्रमाला सुरवात करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले आहे.

या भागात होणार फळबाग लागवड

केवळ शेतकऱ्यांनीच फळबागेतून उत्पन्न घ्यावे असे नाही तर सार्वजनिक ठिकाणी जिथे जागा उपलब्ध आहे त्या क्षेत्रात फळबाग लागवड केली जाणार आहे. यामध्ये गायरान, गावठाण, शासकिय, निमशासकीय जमिन, सामूहिक जमिन, शैक्षणिक संस्थांची जमिनावर हा उपक्रम राबवला जाणार आहे. याबाबत स्थानिक पातळीवर सूचना देण्यात आल्या असून आता लागवड झाली तर पुढे पावसाळ्यात ही फळझाडे टिकून राहणार आहेत. एवढेच नाही तर वैयक्तिक पातळीवर आणि शेती बांधावरही फळबाग लागवडीच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

स्थानिक प्रजातींना प्राधान्य

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत माथा ते पायथा या अंतर्गत हा उपक्रम राबवला जात आहे. यामध्ये स्थानिक पातळीवर ज्या फळांसाठी पोषक वातावरण आहे त्याच फळांची लागवड केली जाणार आहे. यामध्ये चिंच, आवळा, बोर, डाळिंब याची लागवड केली जाणार आहे. संवर्धनाच्या अनुशंगाने तालुका निहाय अंमलबजावणीचा अहवाल हा सादर करावा लागणार आहे. यामध्ये हलगर्जीपणा चालणार नसल्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

ग्रामपंचायती बनवणार अंदाजपत्रक

शिवारात गायरान कीती ? किती क्षेत्रावर फळबागेची लागवड होऊ शकते या अनुशंगाने अंजाजपत्रक तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये स्थळ निश्चिती करुन त्या क्षेत्रावर कोणते फळरोपाची लागवड करायची यासंदर्भातील अहवाल हा सादर करावा लागणार आहे. त्यामुळे उत्पादनात तर वाढ होणारच आहे पण वृक्ष वाढणार हे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.