Watermelon : हंगामी पिकाने शेतकऱ्यास तारले, कोकलेगावतल्या पाटलांनी करुन दाखविले

| Updated on: Apr 04, 2022 | 11:21 AM

खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांसाठी चार महिने मेहनत घेऊनही जे साध्य झालं नाही ते यंदा हंगामी पिकांमधून होत आहे. उन्हाच्या वाढत्या झळा ह्या कलिंगड आणि लिंबू उत्पादकांसाठी सुखद गारवा देत आहेत. भर उन्हाळ्यामध्ये कलिंगडच्या मागणीत वाढ झाली आहे. शिवाय दरही सरासरीपेक्षा अधिक आहे. सर्वकाही पोषक असताना नायगांव तालुक्यातील कोकलेगावातील मारोती पाटलांनी 2 एकरात 60 टन कलिंगडाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. पाटलाच्या या दर्जेदार कलिंगडला थेट हैदराबादहून मागणी होत आहे.

Watermelon : हंगामी पिकाने शेतकऱ्यास तारले, कोकलेगावतल्या पाटलांनी करुन दाखविले
बदलत्या वातावरणामुले कलिंगड उत्पादनावर परिणाम होतोय.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नांदेड : खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांसाठी चार महिने मेहनत घेऊनही जे साध्य झालं नाही ते यंदा (Seasonable Crop) हंगामी पिकांमधून होत आहे. (Summer) उन्हाच्या वाढत्या झळा ह्या कलिंगड आणि लिंबू उत्पादकांसाठी सुखद गारवा देत आहेत. भर उन्हाळ्यामध्ये  (Watermelon) कलिंगडच्या मागणीत वाढ झाली आहे. शिवाय दरही सरासरीपेक्षा अधिक आहे. सर्वकाही पोषक असताना नायगांव तालुक्यातील कोकलेगावातील मारोती पाटलांनी 2 एकरात 60 टन कलिंगडाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. पाटलाच्या या दर्जेदार कलिंगडला थेट हैदराबादहून मागणी होत आहे. व्यापारी बांधावर येऊन कलिंगडची खरेदी करीत असल्याने वाहतूकीचा खर्च तर टळला आहेच पण विक्रमी उत्पादनाबरोबर यंदा विक्रमी दरही मिळत आहे.

परराज्यात विक्रीने मोठा फायदा

स्थानिक बाजारपेठेपेक्षा परराज्यातून कलिंगडला अधिकची मागणी होत आहे. शिवाय दरही चांगला मिळत आहे. कलिंगड हे 12 ते 14 रुपये किलोपर्यंत विकले जात आहे. शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा यंदा अधिकचा दर मिळत आहे. शिवाय 70 दिवसांमध्ये हे पीक पदरात पडत आहे. यंदा कलिंगडाच्या क्षेत्रात मोठी घट झाल्याने या वाढीव दराचा मोजक्याच शेतकऱ्यांना फायदा होत आहे. मारोती पाटील यांनी 2 एकरामध्ये लागवड केली होती. कीड-रोगराईपासून संरक्षण व्हावे याकरिता प्लॅस्टिकचे कपड्याचे अच्छादन आणि पाण्याचे योग्य नियोजन यामुळे त्यांचा फड साधलेला आहे. व्यापाऱ्यांकडून तर मागणी वाढत आहेच शिवाय स्थानिक बाजारपेठेतही दर वधारले आहेत.

पोषक वातावरणाला पाणी साठ्याची जोड

आतापर्यंत निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सर्वच पिकांना बसलेला आहे. मात्र, गेल्या दीड महिन्यात अवकाळीने हजेरी न लावल्यामुळे कलिंगड या हंगामी पिकाची वाढ झाली. शिवाय मुबलक प्रमाणात पाणीसाठा असल्याने कोणते संकट ओढावले नाही. तीन ते चार फवारण्या करुन पाटील यांनी हे पीक जोपासले आहे. आता 70 दिवसाची मेहनत ही कामी आली असून जे हंगामातील पिकांमधून साधले नाही ते कलिंगडातून शेतकऱ्यांच्या पदरी पडत आहे.

सरकारच्या त्या निर्णयाचाही फायदा

दोन वर्षात कोरोनामुळे जे निर्बंध लादण्यात आले होते त्यामुळे कलिंगडला मार्केटच मिळाले नव्हते. परिणामी शेतकऱ्यांनी कलिंगड हे फुकटात वाटली होती. पण यंदा कोरोनाचे कोणतेही निर्बंध नाहीत. शिवाय बाजारपेठा पूर्ण क्षमतेने खुल्या करण्यात आल्या असून वाढत्या उन्हामुळे कलिंगडच्या मागणीत वाढ झाली आहे. 12 ते 14 रुपये किलोप्रमाणे कलिंगडची विक्री होऊ लागली आहे. त्यामुळे गत दोन वर्षात झालेले नुकसान यंदा भरुन निघेल असा शेतकऱ्यांना विश्वास आहे.

संबंधित बातम्या :

‘जीआय’ च्या नावाखाली बनावट शेतीमालाची विक्री केल्यास जेलची हवा, पणन संचालकाचे काय आहेत निर्देश?

Solapur Rain: सोसाट्याच्या वाऱ्यासह सोलापुरात मुसळधार! अवकाळीच्या हजेरीनं शेतकरी धास्तावले

Sugarcane Sludge : अतिरिक्त ऊसासाठी आता अतिरिक्त अधिकारी, काय आहे साखर आयुक्तांचे धोरण ?