AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Grape : द्राक्ष शेतीसमस्यांवर रामबाण उपाय, द्राक्ष बागायतदार संघाचा मोठा निर्णय..!

द्राक्ष बागायतदार संघाने आता राष्ट्रीय संशोधन केंद्र आणि राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेशी करार केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न तर मार्गी लागतीलच पण त्यामुळे उत्पादनात देखील वाढ होईल असा आशावाद आहे. गेल्या काही वर्षातील नुकसान आणि घटते उत्पादन यामुळे बागायदार संघाने हा निर्णय घेतला असून याचा फायदा होणार का हे पहावे लागणार आहे.

Grape : द्राक्ष शेतीसमस्यांवर रामबाण उपाय, द्राक्ष बागायतदार संघाचा मोठा निर्णय..!
द्राक्ष बागांचे नुकासान टाळण्यासाठी आता द्राक्ष बागायतदार संघाने संशोधन संस्थांशी करार केला आहे.
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Jul 23, 2022 | 4:04 PM
Share

पुणे : वातावरणातील बदल आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे गेल्या 4 वर्षापासून (Vineyard) द्राक्ष बागांचे नुकसान हे ठरलेले आहे. त्यामुळे (Nashik Farmer) नाशिक आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी हे आता पीक पध्दतीमध्ये बदल करण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. असे असताना द्राक्ष शेतीमधील समस्या सोडवण्यासाठी द्राक्ष बागायतदार संघानेच मोठा निर्णय घेतला आहे. या संघाने आता दोन संस्थांशी समजंस्य (Agreement) करार केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लागतील आणि दरवर्षी होणारे नुकसान हे कमी होईल असा दावा करण्यात आला आहे. राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार यांनी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. नव्या संशोधन समितीमध्ये नामवंत शास्त्रज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. शिवाय कृषी विद्यापीठाचेही सहकार्य लाभणार आहे.

शेतकऱ्यांपर्यंत पोहचणार अत्याधुनिक तंत्र

द्राक्षावरील किड-रोगराईवर संशोधन करुन त्याचा बंदोबस्त कसा करायचा यावर संस्था ही कार्य करणार आहे. तर या संस्थेला राज्यातील कृषी विद्यापीठाचे सहकार्य राहणार आहे. या सर्वांच्या सहकार्यातून जे तंत्रज्ञान निर्माण होईल ते शेतऱ्यांपर्यंत पोहचवले जाणार आहे. संशोधनाचा फायदा थेट शेतकऱ्यांना व्हावा या उद्देशाने संघाने हा निर्णय घेतला आहे. विद्यापीठांच्या माध्यमातूनही जे संशोधन होते त्याचा देखील फायदा या संस्थांना होणार आहे. एकंदरीत शेतकऱ्यांचे नुकसान टाळून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

बदलत्या वातावरणाचा द्राक्षावर परिणाम

गेल्या 4 वर्षात द्राक्ष उत्पादनातून नफा तर सोडाच पण शेतकऱ्यांचे नुकसानच अधिक झाले आहे. यंदा तर बागा अंतिम टप्प्यात असतानाच अवकाळी पावसाने होत्याचे नव्हते झाले होते. यंदा सर्वच फळबागांचे उत्पादन घटले आहे. ढगाळ वातावरण आणि सततचा पाऊस यामुळे द्राक्ष उत्पादनात निम्म्यापेक्षा अधिकची घट झाली होती. आता बागायतदार संघाने संशोधन संस्थेशी करार केला आहे. त्यामुळे याचा परिणाम कसा होणार हे देखील पहावे लागणार आहे.

संस्थांच्या नियोजनाचा फायदाच होईल

द्राक्ष बागायतदार संघाने आता राष्ट्रीय संशोधन केंद्र आणि राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेशी करार केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न तर मार्गी लागतीलच पण त्यामुळे उत्पादनात देखील वाढ होईल असा आशावाद आहे. गेल्या काही वर्षातील नुकसान आणि घटते उत्पादन यामुळे बागायदार संघाने हा निर्णय घेतला असून याचा फायदा होणार का हे पहावे लागणार आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?