AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

E-Pik Pahani : कृषी विभाग बांधावर, जे दोन महिन्यात झाले नाही ते दोन दिवसांमध्ये होईल का?

खरीप हंगामात ज्या प्रमाणे 'ई-पीक पाहणी'चा गाजावाजा झाला होता त्या तुलनेत रब्बीत या उपक्रमाकडे शेतकऱ्यांनी पूर्णपणे पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. दोन वेळा मुदतवाढ करुनही शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीच्या माध्यमातून पिकांच्या नोंदी करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. शिवाय जनजागृतीकडे कृषी आणि महसूल विभागाकडूनही कानडोळा झाला असल्याने एका जिल्ह्यामध्ये 25 हजाराहून अधिकची नोंद झालेली नाही.

E-Pik Pahani : कृषी विभाग बांधावर, जे दोन महिन्यात झाले नाही ते दोन दिवसांमध्ये होईल का?
संग्रहीत छायाचित्र
| Updated on: Feb 26, 2022 | 1:14 PM
Share

लातूर : खरीप हंगामात ज्या प्रमाणे  ‘ई-पीक पाहणी’चा गाजावाजा झाला होता त्या तुलनेत (Rabi Season) रब्बीत या उपक्रमाकडे शेतकऱ्यांनी पूर्णपणे पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. दोन वेळा मुदतवाढ करुनही शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीच्या माध्यमातून पिकांच्या नोंदी करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. शिवाय जनजागृतीकडे (Agricultural Department) कृषी आणि महसूल विभागाकडूनही कानडोळा झाला असल्याने एका जिल्ह्यामध्ये 25 हजाराहून अधिकची नोंद झालेली नाही. शिवाय आता या (E-Pik Pahani) अॅप बद्दल शेतकऱ्यांना माहिती देखील झाली होती. गेल्या दोन महिन्यांमध्ये शेतकऱ्यांनी अत्यल्प प्रतिसाद दिलेला आहे. आता 28 फेब्रुवारी ही अंतिम मुदत असून किती शेतकरी आपल्या पिकांची नोंद या माध्यमातून करणार हे पहावे लागणार आहे. भविष्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान झाले तर ही नोंदच शेतकऱ्यांसाठी महत्वाची ठरणार आहे. शिवाय खरीप हंगामात याचे महत्व लक्षात येऊनही याकडे दुर्लक्ष झालेले आहे.

हंगाम अंतिम टप्प्यात तरी दुर्लक्ष

सध्या रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात आहे. काही भागामध्ये तर हरभरा पिकाची काढणी सुरु झाली आहे. असे असतानाही कृषी विभागाला ‘ई-पीक पाहणी’च्या माध्यमातून पिकांची नोंद करुन घ्या असे आवाहन करावे लागत आहे. गेल्या खरीप हंगामापासून महसूल कर्मचारी तलाठी यांची भूमिका शेतकरीच बजावत आहे. आपल्या पिकाची नोंद आपणच या अॅपच्या माध्यमातून करुन नुकसानभरपाईला पात्र राहत आहे. खरीप हंगामात लाखो शेतकऱ्यांना याचा लाभ झाला होता. त्यामुळे रब्बीमध्ये सहभाग वाढेल अशी आशा होती पण शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.

का झाली नोंदणी कमी?

खरीप हंगामातील पिकांना निसर्गाच्या लहरीपणाचा धोका असतो. मात्र, रब्बी हंगामात वातावरण हे कोरडे असते शिवाय उत्पादनाच्या दृष्टीने खरीप हंगामाच महत्वाचा मानला जातो. त्यामुळेच खरीप हंगामात 84 लाख शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. सर्वाधिक शेतकरी हे नांदेड जिल्ह्यातील सहभागी झाले होते.पण रब्बी हंगामात वातावरण कोरडे असून पिकांना धोका नसतो म्हणून शेतकरी नोंदणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे कृषी अधिकारी यांनी सांगितले आहे.

आता उरले दोनच दिवस

रब्बी हंगामातील पिकांची नोंद करण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. पण यामध्ये शेतकऱ्यांचा अत्यल्प सहभाग पाहून 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढविण्यात आली होती. गेली दोन महिने कृषी विभागाकडडून जनजागृती केली नाही तर आता अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे दोन महिन्यात झाले नाही ते दोन दिवसांमध्ये होईल का असा प्रश्न आहे.

संबंधित बातम्या  :

कांद्यानंतर सोलापूर बाजार समितीमध्ये कोण खातयं ‘भाव’? नव्याने आवक अन् विक्रमी दरही

तूर खरेदी केंद्र : सुविधांपेक्षा अडचणी अधिक, खरेदी केंद्रावर विक्री सोडा नोंदणीही नाही, नेमके कारण काय?

Sugar Factory : ऊसाचे गाळप रखडले, चिंता कशाला..! काय आहेत शेतकऱ्यांकडे पर्याय?

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...