AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना-भाजपच्या 6 दिग्गजांचा मंत्रिपदावर डोळा, औरंगाबादमधून कुणाची वर्णी लागणार?

राज्यात ऐन दिवाळीच्या पार्श्वभुमीवर आलेले विधानसभा निकालानंतर सत्ता स्थापनेची लगबग सुरू झाली. आता दिवाळीचे दिवे मंदावले आहेत, तरीही भाजप-शिवसेनेमधील सत्तेच्या वाटाघाटी सुरूच आहेत.

शिवसेना-भाजपच्या 6 दिग्गजांचा मंत्रिपदावर डोळा, औरंगाबादमधून कुणाची वर्णी लागणार?
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Oct 30, 2019 | 4:38 PM
Share

औरंगाबाद: राज्यात ऐन दिवाळीच्या पार्श्वभुमीवर आलेले विधानसभा निकालानंतर सत्ता स्थापनेची लगबग सुरू झाली. आता दिवाळीचे दिवे मंदावले आहेत, तरीही भाजप-शिवसेनेमधील सत्तेच्या वाटाघाटी सुरूच आहेत. एकीकडे मुख्यमंत्री कोण होणार यावरून रणकंदन सुरू आहे. तर दुसरीकडे राज्यात कोणकोणत्या आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची (Aurangabad MLA waiting for Ministership) माळ पडणार याचीही चर्चा सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यातही तब्बल अर्धा डझन आमदार मंत्रिपदाची आस (Aurangabad MLA waiting for Ministership) लावून बसले आहेत.

शिवसेना-भाजप युतीला भरभरून आमदार देणारा जिल्हा म्हणजे औरंगाबाद. मात्र, असं असतानाही औरंगाबादकरांच्या पदरी मंत्रीपदांचा दुष्काळच राहिला आहे. विशेष म्हणजे शेजारच्या जालना जिल्ह्यात तीन-तीन मंत्रीपदं मिळाली असताना, औरंगाबाद जिल्ह्याला मात्र वाटाण्याच्या अक्षता देण्यात आल्या. या विधानसभेचा कार्यकाळ संपत असताना अखेरच्या काळात अतुल सावे यांना नावं पुरतं राज्यमंत्रीपद देऊन जिल्ह्याची बोळवण करण्यात आली. मात्र, यावेळी औरंगाबादमधून चांगल्या मंत्रिपदाची मागणी होत आहे.

जिल्ह्यातून तीन वेळा निवडून आलेले प्रशांत बंब, मागच्या वेळी मंत्री राहिलेले अतुल सावे, तब्बल 5 वेळा निवडून येण्याचा विक्रम करणारे संदीपान भुमरे, आघाडी सरकारच्या काळात मंत्री असलेले अब्दुल सत्तार, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विजयाची हॅट्ट्रिक साधणारे संजय शिरसाठ असे जिल्ह्यातील 6 आमदार सध्या मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत.

आमदार प्रशांत बंब हे गंगापूर विधानसभा मतदारसंघातून 3 वेळा निवडून आले आहेत. मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर त्यांचा दांडगा अभ्यास असल्यामुळे त्यांची मंत्रीपदावर दावेदारी आहे. पैठण विधानसभा मतदारसंघातून तब्बल 5 वेळा विजयी झालेले संदीपान भुमरे हे सर्वात सिनिअर आणि अनुभवी आमदार आहेत. त्यामुळे त्यांची दावेदारी प्रबळ मानली जाते. अतुल सावे आणि अब्दुल सत्तार यांनी यापूर्वी मंत्रिमंडळात काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळेलच असंही बोललं जात आहे. विधानसभा अध्यक्षपदाची कारकीर्द गाजवणारे हरिभाऊ बागडे हेही मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. जिल्ह्यातील या सगळ्या आमदारांची पार्श्वभूमी मजबूत असल्यामुळे त्यांचे समर्थक आता मंत्रीपदासाठी आग्रही असलेले पाहायला मिळत आहेत.

मंत्रीपद देताना औरंगाबाद जिल्ह्याकडे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. दुसरीकडे जालना, बीड आणि नांदेड जिल्ह्यांना झुकतं माप मिळत आलं आहे. औरंगाबाद जिल्ह्याला डावलल्यामुळे जिल्ह्याचा विकास खुंटल्याची भावनाही औरंगाबादकर व्यक्त करत आहेत. त्यामुळे किमान यावेळी तरी मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादला योग्य मंत्रिपदं मिळावी, अशी आशा व्यक्त केली जात आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...