जो पर्यंत धरणग्रस्तांचे प्रश्न सुटत नाहीत तो पर्यंत वीज देणार नाही. तुमच्या भावी पिढीला तरी न्याय मिळाला पाहिजे असं मतंही उदयनराजे यांनी व्यक्त केले.
आता पक्षाची कार्यपद्धती, पक्षाचे विचार आणि शाखा यावर कब्जा घेण्याची गरज नाही. ते नियमाप्रमाणे आमचं आहे, असा दावा शंभूराज देसाई यांनी केला.
महाराष्ट्राची प्रगती आणि विकास खुंटला आहे. फक्त दिल्लीची हस्तक असलेली व्यक्ती मुख्यमंत्रीपदावर बसवल्याने महाराष्ट्राची अधोगती सुरू आहे. उताराला लागलेली गाडी असते अशी ही उताराला लागलेली गाडी आहे.
शंभुराज यांचे मला कौतुक आहे. इलाका तुम्हारा, धमाका हमारा. तुमच्या बालेकिल्ल्यात मी येऊन बोलत आहेत. तुम्ही गुवाहाटीत काय शाखा काढायला गेला होता का? जेपी नड्डा शिवसेनेवर बोलले तेव्हा शंभुराज तुम्ही गप्प का होता?
भाजपने मुलायम सिंह यादव यांचा उल्लेख हत्यारा केला होता. त्यांच्यावर हिंदूंच्या हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असं भाजप म्हणत होती. त्यांनात आता भाजपने पद्मविभूषण पुरस्कार दिला आहे.
कराड तालुक्यातील वराडे गावच्या हद्दीत पुणे ते बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येताच बसचा टायर पेटला आणि बसला आग लागली. बघता बघता संपूर्ण बस आगीच्या भक्षस्थानी गेली.
खासदार उदयनराजे भोसले यांनी शिव सन्मानासाठी चलो रायगडची हाक दिली आहे. येत्या 3 तारखेला रायगडावर निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
व्यायाम मंदिर संस्थेचे अध्यक्ष राजू शिरोडकर हे शिवसैनिक असल्याने शिंदे गटाच्या दडपशाहीमुळे ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप होत आहे.
कराड तालुका पोलिसांनी आरोपी अवधूत मदनेचा अवघ्या अडीच तासांत शोध घेतला. त्याला मध्यरात्री करवडी येथून ताब्यात घेण्यात आले.
शिंदे कुटुंबातील हे तिघेजण फुले तोडण्यासाठी विहिरीवर गेले होते. विहिरीवरील विजेचा शॉक लागल्याने तिघेजण विहिरीत फेकले गेले. विहिरीतच त्यांचा मृत्यू झाला.