पत्रकारिता क्षेत्रातील एकूण 7 वर्षांचा अनुभव. तरुण भारत (बेळगाव), झी 24 तास, एबीपी माझा या संस्थांमध्ये काम. राजकीय, शिक्षण, कृषी क्षेत्रातील बातमीदारीकडे कल. वाचन, लेखन आणि भटकंतीची आवड.
निवृत्तीवेतनासाठी वेतनातून निश्चित स्वरुपाची रक्कम दर महिन्याला कपात केली जाते. निवृत्ती वेतनासाठीची रक्कम वेतन आणि उर्वरित नोकरीच्या कालावधीच्या आधारावर ठरवली जाते.
भाजपा हा विषय सोडणार नाही आणि किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला महागात पडेल, असा थेट इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला दिलाय. ते मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय आणि प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांची आठवण काढली. जेव्हा कधी मी गोव्यात येतो तेव्हा मनोहर पर्रिकर यांची कमतरता भासते. तुम्हा गोवेकरांना तर त्यांची कमतरता नेहमी भासत असेल, असं मोदी म्हणाले.
या प्रकरणाचा निकाल येईपर्यंत शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक पोशाखावर कर्नाटक उच्च न्यायालयाकडून बंदी घालण्यात आली आहे. तसंच सर्व शिक्षण संस्था सुरु करा असे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता सोमवारी दुपारी अडीच वाजता होणार आहे.
योग्य वेळी मार्ग न काढल्यास धातू निर्मिती उद्योगावर विपरित परिणाम होऊन टाळेबंदीची वेळ येण्याची भीती ट्रेड युनियन इंटकने व्यक्त केली आहे.
अनेकदा घरातील ज्येष्ठ नागरिकाकडून तुम्ही ऐकले असेल की कोणत्याही आजाराची सुरुवात ही तोंडाद्वारे होत असते म्हणूनच तोंडाची स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे आहे. नुकतेच एका डेंटिस्टने सांगितले आहे की, नियमितपणे सकाळी उठल्यावर एक काम केल्याने भविष्यात 3 जीवघेण्या आजारांपासून बचाव करता येतो.
सीबीएसई बोर्डाची 10वी आणि 12वी दुसऱ्या टर्मची परीक्षा ऑफलाईन होणार आहे. ही परीक्षा 26 एप्रिलपासून घेतली जाणार आहे. सीबीएसईकडून लवकरच या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. कोरोना संकटामुळे सीबीएसई कडून 10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्याचा निर्णय झाला होता.
पंतप्रधान मोदींच्या या मुलाखतीला मोठं महत्व आहे. दरम्यान, या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचही राज्यात भाजपची लाट असल्याचा दावा करत विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. त्याचबरोबर उत्तर प्रदेश सरकार आणि योगी आदित्यनाथ यांच्या योजना आणि कार्याचा गौरवरही पंतप्रधान मोदी यांनी या मुलाखतीत केला आहे.
पहिल्या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेशातील 9 जिल्ह्यातील 58 जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात एकूण 623 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. या निवडणुकीत मुख्य लढाई ही भाजप विरुद्ध समाजवादी पार्टी अशीच असणार आहे. तर बसपा आणि काँग्रेससह अन्य राजकीय पक्षही काही जागांवर मजबूत स्थितीत दिसून येत असल्याचा अंदाज आहे.
तुमच्याच भाषेत बोलायचं तर एकदा प्रशासनाला बाजूला ठेवा, वेळ आणि जागा सांगा आणि मग भाजप कार्यकर्त्यांच्या मनगटातील ताकद काय आहे ते पाहायला या. हे या मराठ्याचं खुलं आव्हान आहे, जय जिजाऊ, जय शिवराय, अशा शब्दात अमित साटम यांनी संजय राऊत यांच्यावर तिखट शब्दात घणाघात केलाय.