PM Narendra Modi : ‘पाचही राज्यात भाजपचीच लाट’, नरेंद्र मोदींचा दावा! वाचा पंतप्रधानांच्या मुलाखतीतील 5 महत्वाचे मुद्दे

पंतप्रधान मोदींच्या या मुलाखतीला मोठं महत्व आहे. दरम्यान, या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचही राज्यात भाजपची लाट असल्याचा दावा करत विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. त्याचबरोबर उत्तर प्रदेश सरकार आणि योगी आदित्यनाथ यांच्या योजना आणि कार्याचा गौरवरही पंतप्रधान मोदी यांनी या मुलाखतीत केला आहे.

PM Narendra Modi : 'पाचही राज्यात भाजपचीच लाट', नरेंद्र मोदींचा दावा! वाचा पंतप्रधानांच्या मुलाखतीतील 5 महत्वाचे मुद्दे
नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 9:04 PM

मुंबई : उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2022) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज एएनआय या वृत्तसंस्थेला सविस्तर मुलाखत दिली. महत्वाची बाब म्हणजे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Assembly Election 2022) पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या होणार आहे. अशावेळी पंतप्रधान मोदींच्या या मुलाखतीला मोठं महत्व आहे. दरम्यान, या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचही राज्यात भाजपची लाट असल्याचा दावा करत विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. त्याचबरोबर उत्तर प्रदेश सरकार आणि योगी आदित्यनाथ यांच्या योजना आणि कार्याचा गौरवरही पंतप्रधान मोदी यांनी या मुलाखतीत केला आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या मुलाखतीतल महत्वाचे 5 मुद्दे आपण पाहू.

‘पाचही राज्यात भाजप विजयी होणार’

पंतप्रधान मोदी म्हणाले की, निवडणूक जाहीर झाल्यानंतर मी कुठल्याही राज्याचा दौरा करु शकलो नाही. कारण निवडणूक आयोगाने काही मर्यादा आखून दिल्या. मात्र व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मी काही ठिकाणी जनतेला संबोधित केलं. आम्ही नेहमी जनतेच्या सेवेत असतो. सरकारमध्ये असतो तेव्हा तर अधिक तीव्रतेनं, अधिक विस्ताराने, ‘सबका साथ, सबका विकास’ हा मूलमंत्र घेऊन काम करतो.

‘मी सर्व राज्यात पाहतो आहे की, भाजप मोठा विजय प्राप्त करेल. भाजपला सर्व पाच राज्यात सेवा करण्याची संधी जनता देईल. ज्या राज्यात सेवा करण्याची संधी मिळाली तेथील जनतेलं आम्हाला जोखलं आहे. मी समजतो की आपल्या देशात वेळ बदलला पण टर्मिनॉलॉजी बदलली नाही. कारण यापूर्वीची सरकारं फक्त फाईलवर स्वाक्षरी करणं, निवडणुका लक्षात ठेवून योजनांची घोषणा आणि भूमिपूजन करुन येणं, इतकंच काम करत होती. त्यांना असं वाटत होतं की घोषणा केली आता काय. लोकांना काम दिसत नाही आणि केवळ घोषणा दिसतात तेव्हा अॅन्टी इन्क्मबन्सी येते. पण सरकारचा प्रयत्न दिसत असेल, योजनांची अंमलबजावणी दिसते तिथे सरकार विरोधी वातावरण दिसत नाही. भाजपशासित राज्यात प्रो इन्क्मबन्सी पाहायला मिळते, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केलाय.

‘बॅनरवरील फोटो मोदींच्या रुपात सर्वसामान्य कार्यकर्त्याचा’

पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारण्यात आला की, उत्तर प्रदेशात अधिकाधिक बॅनरवर केवळ पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचाच फोटो पाहायला मिळाला. त्यावर मोदी म्हणाले की, भारतीय जनता पार्टी एक कलेक्टिव्ह लिडरशीपवर विश्वास ठेवते. सामुहिकतेवर विश्वास ठेवते. बॅनरवरील फोटो पंतप्रधानांचा नाही तर तो नरेंद्र मोदीच्या रुपात भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा आहे. ही निवडणूक आमच्या कार्याची, आमचे आचार विचार, आमची नितीची आहे आणि मला वाटतं की हा जनतेचा विजय असेल.

‘पराभूत होत होतच भाजप विजयी ठरली’

भाजप निवडणुकीत पराभूत होत होतच विजयी ठरली आहे. आम्ही अनेक पराभव पाहिले. अनामत रक्कम जप्त होताना पाहिली. एक वेळ असा होता की आमचे जनसंघाचे नेते पराभवानंतरही मिठाई वाटत होते. तेव्हा मला वाटलं की हे तर पराभूत झाले आहेत आणि मिठाई का वाटत आहे. तर तेव्हा आम्ही विचारलं की पराभवानंतरही मिठाई का वाटत आहात. त्यावेळी सांगितवलं गेलं की आमच्या तीन उमेदवारांची अनामत रक्कम वाचली होती. अशा काळ आम्ही पाहिला आहे.

‘विजयानंतरही आम्ही जमिनीशी जोडलेले राहतो’

आम्ही प्रयत्नरत असतो की विजय आमच्या डोक्यात गेला नाही पाहिजे. त्यामुळे विजयानंतरही आम्ही जमिनीवर राहतो. जमिनीसोबत आपलं नातं घट्ट करण्यावर आम्ही भर देतो. आम्ही पराभवातही आशा शोधतो. निराशेच्या गर्तेत अडकून पडत नाही. आम्ही समोरच्याची रणनिती समजून घेण्याचा आणि आमच्या चुकांचा अभ्यास करतो. त्यानुसार आम्ही पुढील रणनिती ठरवतो. आमच्यासाठी निवडणूक ही एकप्रकारे मुक्त विद्यापीठ आहे. त्यामुळे आम्ही निवडणुकीला आमच्या शिक्षणाचा भाग मानतो, असं मोदी यावेळी म्हणाले.

‘उत्तर प्रदेशात आज सुरक्षा आणि विश्वासाचं वातावरण आहे’

योगींची मेहनत, त्यांच्या यशस्वी योजना या अद्भुत आहेत. त्यांनी असंभव गोष्टी संभव करुन दाखवल्या आहेत. त्यामुळेच विरोधकही त्यांच्या योजनांना कॅश करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. एकप्रकारे मी त्याला योगींचे क्रेडीट मानतो. उत्तर प्रदेशच्या जनतेनं अनेक अडचणींचा सामना केला आहे. तिथे ज्या प्रकारे गुंडाराज आणि दबंगराज चालत होता. तिथल्या सरकारमध्ये दबंग लोकांना आश्रय प्राप्त होता. आमच्या माता-भगिनी घरातून बाहेर पडू शकत नव्हत्या. हे सर्व उत्तर प्रदेशच्या जनतेलं पाहिलं आहे. आज मात्र उत्तर प्रदेशातील मुलगी म्हणते की मी रात्रीच्या अंधारातही कुठे काम असेल तर बाहेर पडू शकते. हा विश्वास लोकांमध्ये निर्माण करण्यात आम्ही यशस्वी ठरलो. तो सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे.

इतर बातम्या :

Video : शाईफेकीच्या घटनेनंतर अमरावतीच्या आयुक्तांची पहिली प्रतिक्रिया काय? रवी राणांचाही गंभीर आरोप; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

संजय राऊत तुम्हची जागा आता “आत”, धमक्या देण्याचे दिवस संपले; नारायण राणेंचा गर्भित इशारा

पुणेकरांना मोठा दिलासा! मिळकत करामध्ये वाढ न करण्याचा महापालिकेचा निर्णय

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.