AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Green Highways वर सरकार 7 लाख कोटी खर्च करणार, नितीन गडकरींचं सॉलिड प्लॅनिंग

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रीन एक्सप्रेस हायवेच्या (Green Express Highways) बांधकामावर सरकार सात लाख कोटी रुपये खर्च करीत आहे.

Green Highways वर सरकार 7 लाख कोटी खर्च करणार, नितीन गडकरींचं सॉलिड प्लॅनिंग
Nitin Gadkari
| Updated on: Mar 24, 2021 | 7:21 PM
Share

नवी दिल्ली : अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रीन एक्सप्रेस हायवेच्या (Green Express Highways) बांधकामावर सरकार सात लाख कोटी रुपये खर्च करीत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी याबाबतची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, या Green Express Highways मुळे देशातील परिवहन अधिक स्मार्ट होईल. त्याचबरोबर प्रदूषणाची पातळी कमी होण्यास मदत होईल. पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्सने डिजिटल पद्धतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. (Government will spend 7 lakh crore rupees on Green Highways, Nitin Gadkari has great planning)

या कार्यक्रमात गडकरी म्हणाले की, 1 लाख कोटी रुपये खर्च करुन दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे पुढील एक वर्षात पूर्ण होईल. त्याचबरोबर दिल्ली-मेरठ एक्सप्रेस वेचे उद्घाटन एक-दोन महिन्यांत होईल. नॅशनल रोड अँड हायवे समिटमध्ये गडकरी म्हणाले की, आम्ही ग्रीन हायवेच्या बांधकामावर सात लाख कोटी रुपये खर्च करीत आहोत. यामुळे देशातील वायू प्रदूषण कमी होण्यास, रहदारी सुलभ होण्यास आणि लॉजिस्टिक्स तसेच वाहतुकीचा खर्च कमी होण्यास मदत होईल.

अत्याधुनिक तंत्रज्ञान व अभियांत्रिकीच्या माध्यमातून हे महामार्ग तयार करण्यात येत असल्याचे गडकरी यांनी सांगितले. यामुळे रहदारी ‘इंटेलिजेंट’ होईल आणि त्याच वेळी पर्यावरण संरक्षणावर लक्ष केंद्रित केले जाईल.

दिल्ली-मुंबई कार प्रवास 12 तासांत

परिवहन मंत्री म्हणाले की, पंतप्रधानांनी राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाईपलाईन अंतर्गत 111 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे लक्ष्य ठेवले आहे आणि हरित दृष्टीकोन स्वीकारून सरकार ‘पर्यावरणाला हानी न पोहोचवता विकास करण्याचा प्रयत्न करीत आहे. नितीन गडकरी म्हणाले की, 22 ग्रीन हायवे कॉरिडोरपैकी दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर दोन महानगरांदरम्यान कारने प्रवास करण्याचा वेळ कमी केला जाईल. हा प्रवास 12 तासांमध्ये होऊ शकेल, सध्या हा प्रवास पूर्ण करण्यासाठी 40 तास लागतात.

60 टक्के काम पूर्ण

गडकरी म्हणाले की, या 1,300 कि.मी. प्रकल्पातील 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम एका वर्षात पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. ते म्हणाले की, दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात आठ लेन असतील. दुसर्‍या टप्प्यात त्यांची संख्या 12 होईल. त्याअंतर्गत स्वतंत्र इलेक्ट्रिक हायवे लेनही बांधली जाईल. ते म्हणाले की, एका वर्षात इलेक्ट्रिक ट्रकदेखील उपलब्ध होतील.

नितीन गडकरी म्हणाले की, दिल्ली-अमृतसर-कटरा प्रकल्पाचे काम दोन ते तीन महिन्यांत सुरू होईल. याशिवाय पाइपलाईनमधील 4,063 कोटी रुपयांचा दिल्ली-फरीदाबाद-सोहना एक्सप्रेस महामार्ग आणि अहमदाबाद-ढोलेरा महामार्ग प्रकल्प 4,000 कोटी रुपयांचा आहे, तोदेखील सादर करण्यात आला आहे.

इतर बातम्या

Maruti Suzuki Car Price Hike: येत्या महिन्यापासून मारुती सुझुकीच्या गाड्या महागणार, जाणून घ्या

कार्सपाठोपाठ बाईक-स्कूटरदेखील महागणार, हिरो मोटोकॉर्पकडून Price Hike ची घोषणा

1 एप्रिलपासून महामार्गांवरुन प्रवास करणं महागणार, जाणून घ्या काय आहेत कारणं

Vehicle Scrappage Policy: कार घेणे आता आणखी स्वस्त होणार, जुन्या कार मालकांना मोठे फायदे, जाणून घ्या सर्वकाही

(Government will spend 7 lakh crore rupees on Green Highways, Nitin Gadkari has great planning)

कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....