Mumbai Milk Price hike: मुंबईकरांना महागाईचा आणखी एक धक्का; सुटे दूध 7 रुपयांनी महागणार

| Updated on: Aug 29, 2022 | 1:35 PM

महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता मुंबईकरांना महागाईचा आणखी एक धक्का बसला आहे. तो म्हणजे सुट्या दुधाच्या दरात वाढ (Milk Price hike) होणार आहे. सुट्या दुधाचे दर प्रति लिटर सात रुपयांनी वाढवण्यात येणार आहेत.

Mumbai Milk Price hike: मुंबईकरांना महागाईचा आणखी एक धक्का; सुटे दूध 7 रुपयांनी महागणार
Follow us on

मुंबई :  सध्या देशात महागाई (inflation) सर्वोच्च स्थरावर पोहोचली आहे. अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत आणि खाद्यतेलापासून ते पेट्रोल, डिझेलपर्यंत सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता मुंबईकरांना महागाईचा आणखी एक धक्का बसला आहे. तो म्हणजे सुट्या दुधाच्या दरात वाढ (Milk Price hike) होणार आहे. सुट्या दुधाचे दर प्रति लिटर सात रुपयांनी वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे आता एक लिटर सुट्या दूधासाठी मुंबईकरांना 80 रुपये मोजावे लागणार आहेत. येत्या एक सप्टेंबरपासून ही दरवाढ लागू होणार आहे. यापूर्वी अमूल (Amul) आणि मदर डेरीकडून देखील दूधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. अमूल आणि मदर डेरीने दूधाच्या दरात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ केली आहे. त्यानंतर आता सुट्या दूधाच्या दरात देखील वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दूधाचे दर का वाढले?

वाढत्या महागाईमुळे पशुपालन करणे शेतकऱ्यांना परवडत नाही. जनावारांसाठी लागणाऱ्या चाऱ्याच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी बंदिस्त पशुपालन केले जाते. तिथे जनावरांना अधिक चाऱ्याची गरज असते. दुसरीकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी यासारख्या इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत.  इंधनामध्ये झालेल्या मोठ्या दरवाढीमुळे वाहतूक खर्च देखील वाढला आहे. सर्वच क्षेत्रात महागाई वाढत असल्याने अखेर दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुट्या दुधाच्या दरात प्रति लिटरमागे सात रुपयांची वाढ करण्यात आली असून, नवे दर एक सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना आता एक लिटर दूधासाठी 80 रुपये मोजावे लागणार आहेत.

देशात महागाईचा भडका

देशात महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल, डिझेलपासून ते अन्नधान्यापर्यंत आणि खाद्यतेलापासून ते पेट्रोल, डिझेलपर्यंत सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवणे हे सरकार आणि भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयसमोर मोठे आव्हान आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी  चालू वर्षात तीनदा आरबीआयकडून रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा