
GK, Trending GK Quiz: सोने आणि चांदीचे दर सध्या प्रचंड वाढले आहेत. सोने आणि चांदीच्या व्यापारात जसे महाराष्ट्रात जळगावचे नाव आहे तसे देशातील एक शहर गोल्ड कॅपिटल ऑफ इंडिया असे म्हटले जाते. येथे सोन्याचे दागिने घडवणारे कारागिर आणि ज्वेलरी शोरुम, सोन्याचा व्यापार होत असतो की हे नाव या शहरास सार्थ ठरते. केरळातील त्रिशूर (Thrissur) या शहरास भारताची सोन्याची राजधानी म्हटले जाते.
त्रिशूरला गोल्ड कॅपिटल ऑफ इंडियासाठी म्हटले जाते की येथे देशातील सर्वात मोठा सोन्याचे दागिने तयार करणारे होलसेल आणि रिटेल केंद्र आहे. येथे हजारो ज्वेलरी युनिट्स, वर्कशॉप्स आणि शोरुम असून ते भारतातील मोठ्या भागाला ज्वेलरी पुरवठा करतात. शहरात जुने जाणते करागिर, लाखो मजूरांची टीम आणि केरळाच्या सोने बाजारातील त्यांच्या ताकदीमुळे या शहरास ही पदवी मिळाली आहे. त्रिशूरमध्ये सोन्याचा व्यापार केरळ राज्यात आणि दक्षिण भारतात पसरला आहे.
त्रिशूर मुख्य रूपाने सोन्याचे दागिने तयार करणे आणि होलसेल व्यापाराचे केंद्र आहे.येथे पारंपारिक आणि मॉडर्न दोन्ही प्रकारची ज्वेलरी तयार केली जाते. खास करुन लग्नसमारंभ, सणासुदीसाठी आणि मंदिरांसाठी दागिने तयार केले जातात. येथे हजारो कारागिर, डिझायनर, ट्रेडर आणि सपोर्ट वर्कर्सना रोजगार मिळतो. त्रिशूरमधून दक्षिण भारतात खूप सारे ज्वेलरी बिझनस डिझाईन आणि पुरवठा होतो. भारतात जगात सर्वात जास्त सोन्याचा खप होतो. त्रिशूर सारख्या शहराचे यात जास्त योगदान आहे.
त्रिशूरचा सोन्याशी संबंध शतकाहून अधिक वर्षे जुना आहे. येथे पारंपारिक सोनारांनी संघटीत होत ज्वेलरी बनवण्याची कला सुरु केली होती. २० व्या शतकात को-ऑपरेटिव्ह बँक, फायनान्शियल इंस्टीट्युशन आणि ट्रेड नेटवर्क वाढल्याने शहरातील सोन्याचा व्यापार आणखीन मजबूत झाला. आज देशात सर्वात मोठा सोन्याचा ज्वेलरी हब म्हणून त्रिशूर आहे.