AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! सुखाचे दिवस येणार, सामान्य लोकांचं नशीब बदलणार? केंद्र सरकार मोठे निर्णय घेण्याची शक्यता!

केंद्र सरकार लवकरच काही मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्याबाबत आता जीएसटी काऊन्सिलची बैठक चालू झाली असून या निर्णयांमुळे सामान्यांना चांगले दिवस येऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

मोठी बातमी! सुखाचे दिवस येणार, सामान्य लोकांचं नशीब बदलणार? केंद्र सरकार मोठे निर्णय घेण्याची शक्यता!
narendra modi and nirmala sitharaman
| Updated on: Sep 03, 2025 | 8:43 PM
Share

GST Council Meeting : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेच्या 56 व्या बैठकीला सुरुवात झाली आहे. ही बैठक एकूण दोन दिवसांची असेल. या बैठकीत देशातील प्रत्येक व्यक्तीवर परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे करप्रमाणाली, जीएसटीची सध्याची पद्धत, वेगवेगळ्या वस्तूंवरील कर याबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार सरकार वेगवेगळ्या 175 वस्तूंवरील कर घटवण्याची शक्यता व्यक्त केली जात असून या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

फक्त दोनच टॅक्स स्लॅब राहणार?

मिळालेल्या माहितीनुसार सरकार साधारण 175 वेगवेगळ्या वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा विचार करत आहे. जीएसटीमधील ही घट साधारण 10 टक्क्यांपर्यंत असू शकते, असे सांगितेल जात आहे. सध्या जीएसटीअंतर्गत एकूण 5%, 12%, 18% आणि 28% असे एकूण चार स्लॅब आहेत. जीएसटी परिषदेच्या बैठकीत चार ऐवजी आता फक्त दोनच स्लॅब करण्याचा प्रस्तावीत आहे. या प्रस्तावअंतर्गत आवश्यक वस्तूंसाठी 5 टक्के तर तुलनेने कमी गरजेच्या वस्तूंवर 18 टक्के अशी करप्रणाली लागू करण्याचाही प्रस्ताव ठेवला जाऊ शकतो. तंबाखूजन्य उत्पादनांसाठी, 50 लाखापेक्षा जास्त किंमत असलेल्या वस्तूंसाठी 40 टक्के कराचा एक अतिरिक्त स्लॅब लागू करण्याचाही या बैठकीत निर्णय होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.

सामान्य लोकांना मिळणार दिलासा

जीएसटीच्या प्रस्तावित बदलांमध्ये 12 टक्के कर असलेल्या वस्तूंवर कर कमी करून सामान्यांना दिलासा दिला जाण्याची शक्यता आहे. 12 टक्के स्लॅबमधील साधारण 99 टक्के वस्तू या 5 टक्के स्लॅबमध्ये आणल्या जाण्याची शक्यता आहे. यामध्ये सुखा मावे, नमकीन, पॅक लेले पाणी, काही प्रकारचे बुट, कपडे, औषध, वैद्यकीय उपकरण, रोजच्या वापरातील वस्तू यांचा यात समावेश आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास समान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जीएसटी परिषदेत नेमकं काय होणार?

मिळालेल्या माहितीनुसार पर्सनल केअर प्रोडक्ट्स, टुथपेस्ट, साबण, शाम्पू, टॅल्कम पाऊडर, जाम, स्कॅन्क्स आदी वस्तूदेखील स्वत् होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता जीएसटी परिषदेत नेमके काय निर्णय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Follow Us
LIVE अपडेट्स! शिवसेना पक्ष, चिन्हाप्रकरणी सुनावणी सुरू; सुरतहून आमदार
LIVE अपडेट्स! शिवसेना पक्ष, चिन्हाप्रकरणी सुनावणी सुरू; सुरतहून आमदार गुवाहटीला गेले हा योगायोग...
केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? यंदा 3 दिवसांचं विशेष...
केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? यंदा 3 दिवसांचं विशेष अधिवेशन, नेमकी कसली चर्चा?
कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार?
मोठी बातमी! कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पहाच
अमित शाह तोंड लपवत आहेत; ते विद्यार्थ्यांचे गुन्हेगार - राहुल गांधींचा
Rahul Gandhi on Amit Shah | अमित शाह तोंड लपवत आहेत; ते विद्यार्थ्यांचे गुन्हेगार - राहुल गांधींचा थेट हल्ला!
दिल्लीत भेटीगाठी सुरू! राहुल गांधींसोबतच्या भेटीनंतर किरण रिजीजू थेट
दिल्लीत भेटीगाठी सुरू! राहुल गांधींसोबतच्या भेटीनंतर किरण रिजीजू यांची थेट अमित शाह यांच्यासोबत बैठक, पडद्याआड मोठ्या अडामोडी
इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला प्रस्ताव
मोठी बातमी! इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला मोठा प्रस्ताव!
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संबंधित...
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या ! लवकरच होणार मोठा फेरबदल, पुढे...
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या ! लवकरच  होणार मोठा फेरबदल, पुढे काय घडणार ?
मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
मोठी बातमी! मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
झारखंडमधील विद्यार्थांचं आंदोलन पेटलं! अभिजीत दीपकेंची भूमिका काय?
झारखंडमधील विद्यार्थांचं आंदोलन पेटलं! अभिजीत दीपकेंची भूमिका काय असणार?