AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोटाबंदीनंतर भारतात कॅश फ्लो किती वाढला? आकडे पाहून तुम्हीही हादराल!

२०१६ मधील नोटबंदीनंतर सरकारने रोख व्यवहार कमी करून डिजिटल व्यवहारांना चालना देण्याचा निर्णय घेतला. मात्र तब्बल ८ वर्षांनंतरही प्रत्यक्षात चित्र वेगळंच दिसत आहे!

नोटाबंदीनंतर भारतात कॅश फ्लो किती वाढला? आकडे पाहून तुम्हीही हादराल!
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: Jun 17, 2025 | 6:02 PM
Share

भारताला नोटबंदीचा निर्णय घेऊन आता जवळपास आठ वर्षे पूर्ण होत आली आहेत. २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका ऐतिहासिक निर्णयात रात्री ८ वाजता जाहीर केले की मध्यरात्रीपासून १००० आणि ५०० रुपयांचे जुन्या स्वरूपातील नोटा अमान्य ठरतील. यानंतर २००० रुपयांची नवीन नोट चलनात आणण्यात आली आणि १००, ५००, ५०, २० रुपयांच्या नोटांचेही नवीन स्वरूप प्रकाशित झाले. सरकारने या निर्णयामागे मुख्यतः भ्रष्टाचाराला आळा घालणे, नकली नोटांचे प्रचलन थांबवणे आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट ठेवलं होतं.

पण आठ वर्षांनंतर जर आपण पाहिलं, तर आकडे सांगतात की प्रत्यक्षात देशात कॅशचा प्रवाह कमी होण्याऐवजी उलट वाढला आहे. आणि ही वाढ पाहून अनेक तज्ज्ञही चकित झाले आहेत.

कॅश वापर कमी होण्याऐवजी उलट वाढ!

२०१६-१७ या आर्थिक वर्षात जेव्हा नोटबंदी झाली, तेव्हा देशात रोखीची देवाण-घेवाण खूपच घटेल असा अंदाज होता. सरकारकडून डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन दिलं गेलं आणि UPI सारख्या प्रणालींचा प्रसार सुरू झाला. त्यातच २०१९-२० मध्ये कोविड महामारीमुळे ऑनलाईन व्यवहारांना अधिक गती मिळाली. लोकांनी सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर डिजिटल पेमेंटचा वापर करायला सुरुवात केली.

पण तरीही देशातील रोख व्यवहारांची आकडेवारी वेगळं चित्र सांगते. एका ताज्या अहवालानुसार, २०१६-१७ पासून २०२३-२४ पर्यंत भारतात रोखीचा प्रवाह सुमारे १६५ टक्क्यांनी वाढला आहे. म्हणजेच अजूनही बहुतांश भारतीय लोक आपल्या व्यवहारांमध्ये रोख पैशाचाच वापर करतात.

UPI व्यवहारांनी घेतले आहे जोर

दुसरीकडे, UPI नेही जबरदस्त प्रगती केली आहे. २०१६ मध्ये सुरू झालेल्या UPI प्रणालीचा वापर आता प्रचंड वाढला आहे. फेब्रुवारी २०२४ पर्यंत केवळ एका महिन्यात UPI व्यवहारांची रक्कम तब्बल १८.०७ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यावरून हे स्पष्ट होते की भारतात एकीकडे रोखीचा वापर वाढत आहे, तर दुसरीकडे डिजिटल व्यवहारांचाही विस्तार जोरात सुरू आहे.

नोटबंदीच्या उद्दिष्टांवर प्रश्नचिन्ह

नोटबंदीचा उद्देश नकली नोटा रोखणे, काळा पैसा बाहेर काढणे आणि आर्थिक व्यवहार पारदर्शक करणे असा होता. पण इतक्या वर्षांनंतरही भारतातील आर्थिक व्यवहारांमध्ये रोख व्यवहारांचे प्रमाण प्रचंड आहे. या उलट, काळा पैसा रोखण्यात आणि नकली नोटा पूर्णपणे बंद करण्यात अपेक्षित यश मिळालं का, हा प्रश्न अजूनही चर्चेचा विषय आहे.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....