AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी, 1 तारखेला पगार मिळणार नाही; समोर आले मोठे कारण

Salary : 1 मे रोजी कर्मचाऱ्यांच्या वेतनात विलंब होण्याची शक्यता आहे. यामागे नेमकं काय कारण आहे आणि तुमचे वेतन खात्यावर कधी जमा होऊ शकते याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी, 1 तारखेला पगार मिळणार नाही; समोर आले मोठे कारण
Salary LateImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Apr 27, 2026 | 9:44 PM
Share

भारतातील नोकरदार वर्गासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महिनाभर काम केल्यानंतर नोकरदारांनी दर महिन्याच्या 1 तारखेला पगार मिळतो. मात्र आता या एप्रिल महिन्याच्या पगारासाठी तुम्हाला थोडी प्रतिक्षा करावी लागू शकते. कारण अनेक कर्मचाऱ्यांना 1 मे रोजी पगार मिळण्याची शक्यता कमी आहे. याचे कारण म्हणजे या दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमेमुळे अनेक बँकांना सुट्टी असण्याची शक्यता आहे, त्यामुळे व्यवहार बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या दिवशी पगार जमा होण्यास विलंब होऊ शकतो.

बँका बंद असल्याने प्रक्रिया प्रभावित

1 मे रोजी सरकारी आणि खासगी बँका बंद असल्यास सॅलरी प्रोसेसिंग तसेच NEFT/RTGS सारख्या बँकिंग सेवांमध्ये उशीर होऊ शकतो. काही डिजिटल सेवा सुरू असल्या तरी पगार जमा करण्याची प्रक्रिया अनेकदा बँकांच्या कामकाजाच्या दिवशीच पूर्ण होते. त्यामुळे 1 तारखेला पगार मिळण्याची शक्यता कमी आहे.

पगार कधी होणार?

ज्या कामगारांचा पगार 1 मे रोजी जमा होणार होता, त्यांच्या खात्यात पैसे पुढील कामकाजाच्या दिवशी म्हणजे 2 मे किंवा त्यानंतर जमा होऊ शकतात. ही प्रक्रिया कंपनीने पगार कधी प्रोसेस केला आहे आणि संबंधित बँकेच्या क्लिअरिंग वेळेवर अवलंबून असेल.

खासगी कंपन्यांमध्ये परिस्थिती वेगळी

काही खासगी कंपन्या सुट्टीपूर्वीच पगार जमा करतात, जेणेकरून कर्मचाऱ्यांना अडचण येऊ नये. तर काही कंपन्या नियमित वेळापत्रकानुसारच प्रक्रिया करतात, त्यामुळे 1-2 दिवस उशीर होऊ शकतो.

डिजिटल बँकिंगवरही परिणाम

UPI आणि मोबाईल बँकिंग सेवा 24×7 सुरू असल्या तरी पगार जमा होण्याची प्रणाली अनेकदा बॅच प्रोसेसिंगवर आधारित असते. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी त्याचा परिणाम दिसू शकतो.

कर्मचाऱ्यांनी काय करावे?

जर 1 मे रोजी पगार जमा झाला नाही, तर घाबरण्याची गरज नाही. हा उशीर तात्पुरता असतो आणि पुढील कामकाजाच्या दिवशी पैसे खात्यात जमा होऊ शकतो.

मे महिन्यात बँका किती दिवस बंद?

मे महिन्यात विविध सुट्ट्यांमुळे बँका एकूण 13 दिवस बंद राहू शकतात. यात रविवार, दुसरा-चौथा शनिवार तसेच ईद यासारख्या सणांच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. मात्र या सुट्ट्या प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या असू शकतात.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल