AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

….. तर विकासाला ब्रेक निश्चित : रघुराम राजन

नवी दिल्ली: देशभरात सध्या निवडणुकांचे वारे वाहत असताना, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चे माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 2019 नंतर देशात जर कोणतंही स्थिर सरकार न आल्यास किंवा आघाडी-युतीचं सरकार आल्यास अर्थव्यवस्थेची गती कमी होईल, असा अंदाज रघुराम राजन यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने देशात स्थिर […]

..... तर विकासाला ब्रेक निश्चित : रघुराम राजन
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM
Share

नवी दिल्ली: देशभरात सध्या निवडणुकांचे वारे वाहत असताना, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चे माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 2019 नंतर देशात जर कोणतंही स्थिर सरकार न आल्यास किंवा आघाडी-युतीचं सरकार आल्यास अर्थव्यवस्थेची गती कमी होईल, असा अंदाज रघुराम राजन यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने देशात स्थिर आणि मजबूत सरकार हवं, मजबूर सरकार नको असं म्हणत असतात. राजन यांचं विधान मोदींच्या या वक्तव्याच्या जवळ जाणारं आहे.

स्वित्झर्लंडमधील दावोस (DAVOS) इथं सुरु असलेल्या जागतिक अर्थपरिषदेदरम्यान (वर्ल्ड इकोनॉमिक फोरम) ते बोलत होते. यावेळी रघुराम राजन यांनी जीएसटी आणि नोटबंदी आणि आरबीआयच्या स्वातंत्र्याबाबतही मत व्यक्त केलं. यावेळी राजन यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानांबाबत भाष्य केलं. भारतात उद्योगांना अनुकूल वातावरण गरजेचं आहे, असं ते म्हणाले.

राजन म्हणाले, “देशात 2019 च्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नाही आणि जर आघाडी किंवा युतीचं सरकार आलं, तर अर्थव्यवस्थेची गती कमी होईल”.

दुसरीकडे काँग्रेस सत्तेत आल्यास राजन यांना अर्थमंत्री करणार असल्याच्या चर्चांवरही राजन यांनी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, मी काही राजकारणी नाही, हे सर्व अंदाज आहेत, जे चुकीचे आहेत.

दरम्यान, लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली होती. सत्तास्थापनेसाठी त्यांना कोणत्याही पक्षाची मदत घ्यावी लागली नव्हती. स्थिर सरकार असल्यामुळे निर्णय घेणं हे कोणत्याही सरकारला सोपं जातं. त्याउलट मित्रपक्षांची मदत घेऊन सत्ता स्थापन केल्यास, निर्णयप्रक्रियेत विलंब होतो हे सत्य आहे. त्यामुळेच रघुराम राजन यांनी आघाडी-युती ऐवजी एकहाती सत्ता असलेलं सरकार आल्यास अर्थव्यवस्थेची गती कायम राहिल असा अंदाज वर्तवला.

Follow Us
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत; उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत;  उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी सांगितलं बैठकीत काय घडलं?
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर....
Parbhani | परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर, गावकऱ्यांची मदतीसाठी आर्त हाक!
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ!
तटकरेंचा तट तोडून आले! भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
Chhagan Bhujbal | तटकरेंचा तट तोडून आले! राज्यसभा अर्जावेळी भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं कृत्य, थेट स्टेटस  ठेवला अन्... पुढे काय घडलं?
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी...
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी, थेट अर्वाच्च भाषेत... व्हिडीओ व्हायरल