AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातल्या मराठी उद्योगपतीच्या घरातला वाद कसा मिटणार? किर्लोस्करांना सुप्रीम कोर्टानं मार्ग दाखवला

किर्लोस्कर कुटुंबातील संपत्तीचा वाद आता सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडच्या वतीने (KBL)कौटुंबीक वादासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचीका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थिने वाद सुटल्यास चांगले होईल असे म्हटले आहे.

महाराष्ट्रातल्या मराठी उद्योगपतीच्या घरातला वाद कसा मिटणार? किर्लोस्करांना सुप्रीम कोर्टानं मार्ग दाखवला
ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातल्या तीन याचिकांवर आज सुनावणी
| Edited By: | Updated on: Nov 26, 2021 | 12:16 PM
Share

मुंबई : (Kirloskar Family Dispute) किर्लोस्कर कुटुंबातील संपत्तीचा वाद आता सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडच्या वतीने (KBL)कौटुंबीक वादासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचीका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने प्रतिवादी असलेले अतुल चंद्रकांत किर्लोस्कर आणि अन्य 13 जनांना वाद मध्यस्थीने सोडवण्याचा आदेश दिला आहे. जर हा वाद मध्यस्थीने न सुटल्यास न्यायालयाला या प्रकरणात अंतरीम आदेश द्यावे लागतील असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. दरम्यान यापूर्वी हा खटला मुंबई उच्च न्यायालयात चालू होता. मुंबई उच्च न्यायलयाने देखील हा खटला कुटुंबातील सदस्यांच्या सहमतीने सोडवण्यात यावा असे म्हटले होते. आता उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात केबीएलने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

काय आहे प्रकरण?

केबीएलचे प्रमुख असलेले संजय किर्लोस्कर यांनी आरोप केला आहे की,  त्यांचे भाऊ अतुल किर्लोस्कर आणि संजय किर्लोस्कर यांच्या मालकी अंतर्गत येणाऱ्या कंपन्या या किर्लोस्कर बँन्डचा चुकीच्या पद्धतीने वापर करून जनतेची दिशाभूल करत आहेत. तर दुसरीकडे मात्र आपल्या विरोधात करण्यात आलेले आरोप अतुल आणि राहुल यांनी फेटाळून लावले आहेत. दरम्यान दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्टाने असे म्हटले आहे की, या  खटल्याशी संबंधित पाच कंपन्यांपैकी तीन कंपन्यांना सर्वोच्च न्यायलयाच्या माजी न्यायाधीश इंदु मल्होत्रा यांची मध्यस्थी मान्य आहे. मात्र यातील दोन कंपन्या या मध्यस्थीसाठी तयार नाहीत. मध्यस्थी करायची असेल तर सर्व कंपन्यांमध्ये झाली पहिजे. अन्यथा सर्वोच्च न्यायलयाला अंतरिम आदेश द्यावे लागतील.

जुलैमध्ये सुरू झाला वाद

हा वाद मागील वर्षीच्या जुलै महिन्यापासून सुरू आहे. अतुल आणि राहुल किर्लोस्कर हे दोघे मिळून पाच कंपन्यांचे मालक आहेत. दरम्यान त्यांनी आपल्या कंपन्यांची नवी ओळख तयार करण्यासाठी कंपन्यांमध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेतला होता. या अंतर्गत कंपनीचा लोगो, कलर आणि अन्य काही गोष्टी बदलण्यात आल्या. मात्र या पाच कंपन्याचा लोगो हा किर्लोस्कर यांनी 130 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या कंपनीशी मिळता जुळता आहे. यातून संबंधित कंपन्यांनी 130 वर्षांची परंपरा असलेल्या किर्लोस्कर कंपनीची प्रतिमा चोरण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप संजय किर्लोस्कर यांनी केला आहे.

संबंधित बातम्या 

देशी की विदेशी? परदेशी ब्रँडच्या दारूच्या किंमतीत थेट 36 टक्क्यांनी घट, सरकारची कृपा

आधारच्या मदतीने रोखता येणार कर चोरी; ‘एनपीसीआय’चा दावा

अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी सरकार करणार 2.5 लख कोटींचा अतिरिक्त खर्च; ‘या’ गोष्टींवर मिळणार सबसीडी

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.