अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी सरकार करणार 2.5 लख कोटींचा अतिरिक्त खर्च; ‘या’ गोष्टींवर मिळणार सबसीडी

अर्थव्यवस्थेला आणखी बळकटी देण्यासाठी सरकार 2.5 लख कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च करण्याच्या तयारीत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या पैशांमधून  अन्न प्रक्रिया उद्योग आणि रासायनिक खते व औषधांवर सबसीडी  देण्यात येणार आहे.

अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी सरकार करणार 2.5 लख कोटींचा अतिरिक्त खर्च; 'या' गोष्टींवर मिळणार सबसीडी
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 6:15 AM

नवी दिल्ली : गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट होते. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला, मात्र आता देश हळूहळू कोरोनाच्या सावटातून सावरत असून, अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. दरम्यान अर्थव्यवस्थेला आणखी बळकटी देण्यासाठी सरकार 2.5 लख कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च करण्याच्या तयारीत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या पैशांमधून  अन्न प्रक्रिया उद्योग आणि रासायनिक खते व औषधांवर सबसीडी  देण्यात येणार आहे. येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये याबाबतचा प्रस्ताव आणला जाण्याची शक्यता आहे.

अन्न व खतांवर मिळणार सबसीडी

कोरोना काळामध्ये गरिबांना अन्न मिळावे यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला ती फक्ती तीन महिन्यांसाठी मर्यादीत होती. मात्र त्यानंतर या योजनेमध्ये सातत्याने वाढ करण्यात आली. तसेच खतांच्या खरेदीवर देखील मोठ्या प्रमाणात सबसीडी देण्यात आली आहे. या सर्व योजनांवर आतापर्यंत तब्बल 1.6  लाख कोटींचा खर्च झाला आहे. यापुढे देखील या योजनेला मुदतवाढ देऊन अतिरिक्त खर्चाचा निधी या योजनेसाठी वापरला जाऊ शकतो. तसेच अतिरिक्त खर्चाच्या निधीतून काही रक्कम ही मनरेगा सारख्या योजनांना देखील मिळणार असल्याचे बोलेले जात आहे.

मनरेगासाठी 30 हजार कोटी

केंद्राच्या वतीने ग्रामीण भागातील लोकांना मनरेगा अंतर्गंत दर वर्षी 175 दिवसांचा रोजगार पुरवण्यात येतो. मनरेगा योजनेंतर्गत गावातील विविध विकास कामे करण्यात येतात. त्यामुळे या योजनेसाठी देखील केंद्राच्या वतीने 30 हजार कोटींचा अतिरिक्त निधी खर्च करण्यात येऊ शकतो.  मनरेगा अंतर्गत ग्रामीण भागातील रोजगारात वृद्धी व्हावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.

संबंधित बातम्या 

रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर पुन्हा बदलले; आता मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

‘या’ राज्यात जुनी वाहने ठेवणे होणार महाग; ग्रीन टॅक्समध्ये भरमसाठ वाढ

‘ही ‘ विदेशी कंपनी करणार एक हजार अभियंत्यांची भरती; मिळणार मोठे पॅकेज

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.