AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांगलादेशमध्ये सत्तेत येताच BNP चं भारताबाबत सर्वात मोठं विधान, दोन्ही देशांमधील तणाव प्रचंड वाढणार

बांगलादेशमध्ये बीएपीचा ऐतिहासिक विजय झाला आहे, या विजयानंतर पक्षाकडून भारतासंदर्भात मोठं विधान करण्यात आलं असून, यामुळे आता दोन्ही देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे.

बांगलादेशमध्ये सत्तेत येताच BNP चं भारताबाबत सर्वात मोठं विधान, दोन्ही देशांमधील तणाव प्रचंड वाढणार
Tariq Rehman
| Updated on: Feb 13, 2026 | 6:22 PM
Share

बांगलादेशमध्ये झालेल्या निवडणुकीत बीएनपी (BNP) चा ऐतिहासिक विजय झाला आहे. बांगलादेशमध्ये बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टीला दणदणीत यश मिळालं. दरम्यान बांगलादेशमध्ये सत्तेत आल्यानंतर आता बीएनपीकडून भारतासंदर्भात मोठं विधान करण्यात आलं आहे, पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, यामुळे पुन्हा एकदा भारत आणि बांगलादेशमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशमध्ये पाठवण्याचा मुद्दा आम्ही भारतासमोर उपस्थित करू असं बीएनपीने म्हटलं आहे. बीएनपीचे ज्येष्ठ नेते सलाहुद्दीन अहमद यांनी शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणावर प्रतिक्रिया देतान हे वक्तव्य केलं आहे. आम्ही भारत सरकारला असं आव्हान करू की त्यांनी शेख हसीना यांना बांगलादेशच्या ताब्यात द्यावं, त्यानंतर त्या आपली न्यायालयीन लढाई लढतील, असं त्यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना सलाहुद्दीन अहमद यांनी असं देखील म्हटलं आहे की, शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणासाठी आम्ही भारतावर दबाव टाकू, आम्ही भारत सरकारला असं आव्हान करू की त्यांनी शेख हसीना यांना बांगलादेशच्या ताब्यात द्यावं. शेख हसीना या बांगलादेशमध्ये आल्यानंतर आपली न्यायालयीन लढाई लढतील. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमधील हा प्रश्न आहे, आम्ही त्यावर पुढील काळात काम करू असंही यावेळी सलाहुद्दीन यांनी म्हटलं आहे.

तणाव वाढणार?

दरम्यान बीएनपीचे नेता सलाहुद्दीन यांनी शेख हसीना यांच्याबद्दल केलेलं हे विधान अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण सलाहुद्दीन यांचा पक्ष आता तारिक रहमान यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन करणार आहे. तारिक रहमान यांच्यापूर्वी बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांचं जे काळजीवाहू सरकार होतं, त्यांची देखील हीच भूमिका होती, त्यांनी देखील शेख हसीना यांचं प्रत्यार्पण करावं अशी मागणी केली होती. दरम्यान आता सत्तेत येताच बीएपीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे, त्यामुळे आता तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारताकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र आता हा कळीचा मुद्दा बणण्याची शक्यता आहे.

Follow Us
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....