LIC : एसएमएस आला का? मग करु नका ही चूक, नाहीतर होईल मोठे आर्थिक नुकसान, काय आहे एलआयसी अलर्ट..

| Updated on: Dec 22, 2022 | 12:08 AM

LIC : एलआयसीने ग्राहकांसाठी अलर्ट घोषीत केला आहे..

LIC : एसएमएस आला का? मग करु नका ही चूक, नाहीतर होईल मोठे आर्थिक नुकसान, काय आहे एलआयसी अलर्ट..
फसवणूक टाळा
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) त्यांच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी एक संदेश (SMS) पाठविला आहे. त्यात त्यांनी ग्राहकांना फसवणुकीपासून वाचण्याचा इशारा दिला आहे. या संदेशात ग्राहकांना केवायसी (KYC) पडताळा करताना जागरुक राहण्याचा सल्ला दिला आहे. देशात ऑनलाईन फसवणुकीच्या अनेक घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे एलआयसीने ग्राहकांना हा सल्ला दिला आहे.

ऑनलाईन फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी उपाय योजना करण्यात येत असल्याने सायबर भामटे ही नवीन नवीन आयडिया लढवत आहेत. ग्राहकांना फसविण्यासाठी जाळे फेकत आहेत. ग्राहकांना जाळ्यात ओढण्यासाठी त्यांनी एसएमएसचा वापर सुरु केला आहे. त्यामुळे एलआयसीने ग्राहकांना सजग केले आहे.

एलआयसीने स्पष्ट केले आहे की, केवायसी पडताळ्यासाठी एलआयसी कधीही ग्राहकांना कॉल, एसएमएस, व्हॉट्सअप, ईमेल करत नाही. त्यामुळे ग्राहकांनी अशाप्रकारे केवायसी पडताळ्यासाठी कोणी संपर्क साधत असेल तर त्या कॉल, एसएमएस, व्हॉट्सअप, ईमेलला उत्तर न देण्याचे आवाहन एलआयसीने पॉलिसी होल्डर्सला केले आहे.

हे सुद्धा वाचा

एलआयसीने KYC अपडेट न केल्यास दंड लावण्यासंदर्भातील व्हायरल मॅसेजवर ट्विट केले आहे. त्यात, एलआयसीने अशा प्रकारच्या संदेशात वैयक्तिक माहिती शेअर न करण्याची खबरदारी घेण्याचे आवाहन ग्राहकांना केले आहे. तसेच अशा भुलथापांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.

एलआयसीने केवायसी अपडेट करण्याविषयी अशा मॅसेजकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले आहे. ग्राहकांना चांगली सेवा मिळावी यासाठी एलआयसी ग्राहकांना केवायसी अपडेट करण्याचे आवाहन करते. पण त्यासाठी कोणताही दंड आकारत नसल्याचे एलआयसीने स्पष्ट केले आहे.