AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Government Bank : सरकारी बँकांनी पुसला हा कलंक! अशी बजावली कामगिरी

Government Bank : सरकारी बँकांनी कात टाकली आहे. सरकारी बँकांनी भुतो न भविष्यती अशी कामगिरी बजावली आहे...

Government Bank : सरकारी बँकांनी पुसला हा कलंक! अशी बजावली कामगिरी
| Updated on: May 21, 2023 | 7:38 PM
Share

नवी दिल्ली : सरकारी बँकांमध्ये (Government Bank) वेळेवर कधीच काम होत नाही, सुविधा मिळत नाही, गतीने काम होत नाही. खासगी बँकांसारखी जलद सेवा मिळत नाही, अशा अनेक तक्रारींचा सूर या बँकांविरोधात असतो. त्यात काही प्रमाणात तथ्य पण आहेत. ग्रामीण भागात तर त्यांच्या सेवांबाबत मोठी नाराजी आहेत. पण याच सरकारी बँकांनी स्वतःवरील एक कलंक पुसला आहे. देशातील सरकारी बँका तोट्यात जाणे आणि कोणत्याही व्यावसायिकांनी त्यांना चूना लावणं हे गणित ठरलेलं होतं. पण गेल्या पंचवार्षिकमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी (Public Sector Bank) या आरोपांना छेद दिला आहे. कधी काळी मोठा तोटा सहन करणाऱ्या बँकांनी मोठा नफा (Profit) कमाविला आहे.

एकट्या एसबीआयचे इतके योगदान PTI च्या अहवालानुसार, गेल्या आर्थिक वर्षात (2022-23) सार्वजनिक क्षेत्रातील बँका म्हणजे पीएसबी बँकांनी नफा कमविण्यात मोठा रेकॉर्ड केला. या बँकांना सामुहिकरित्या 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये अर्धी हिस्सेदारी एकट्या स्टेट बँक ऑफ इंडियाची आहे. याचा अर्थ जेवढा नफा देशातील 11 सरकारी बँकांनी कमाविला. त्यातील अर्धा वाटा एकट्या एसबीआयचा आहे.

5 वर्षांपूर्वी झाला होता तोटा सरकारी बँकांच्या आर्थिक लेखाजोख्यावर नजर टाकली तर गेल्या काही दिवसांमध्ये या बँकांनी खूप मोठा पल्ला गाठल्याचे दिसून येईल. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये या सरकारी बँका केवल तोट्यात होत्या. या कालावधीत सरकारी बँकांना एकूण 85,390 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. पण आता ही परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये या बँकांनी 1,04,649 कोटी रुपयांचा नफा कमविला आहे. हा या बँकांच्या बदलत्या धोरणांचा परिणाम आहे.

वर्षभरातच 57 टक्क्यांहून अधिकचा फायदा रिपोर्टनुसार, या 12 सरकारी बँकांचा नफा गेल्यावर्षीपेक्षा, आर्थिक वर्ष 2021-22 च्या तुलनेत 57 टक्क्यांनी वाढला आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या दरम्यान सर्व 12 सरकारी बँकांना मिळून 66,539.98 कोटी रुपयांचा फायदा झाला. आर्थिक वर्ष 2022-23 या काळात सरकारी बँकांच्या नफ्यामध्ये एसबीआयने मोठी भरारी घेतली. एसबीआयने 50 हजार कोटी रुपयांचा नफा कमविला.

या बँकांना झाला सर्वाधिक फायदा गेल्या आर्थिक वर्षात स्टेट बँक ऑफ इंडियाचा नफा 59 टक्क्यांनी वाढून 50,232 कोटी रुपये झाला. तर सर्वांना चकित करत बँक ऑफ महाराष्ट्राने मोठी झेप घेतली. ही बँक जोरदार फायद्यात आली. महाबँकेने 126 टक्क्यांचा नफा कमविला. या बँकेने 2,602 कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर युको बँकेचा क्रमांक आहे. या बँकेने 100 टक्के नफा कमवित 1,862 कोटी रुपये आणि बँक ऑफ बडोद्याने 94 टक्के तेजीसह 14,110 कोटी रुपयांचा नफा मिळविला.

पंजाब नॅशनल बँक पिछाडीवर गेल्या आर्थिक वर्षात केवळ पंजाब नॅशनल बँकेच्या नफ्यात घसरण आली. ही बँक सोडून इतर सर्व 11 सरकारी बँकांनी जोरदार नफा कमविला. पीएनबीचा शुद्ध लाभ आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 3,457 कोटी रुपये होता. त्यात 27 टक्के घसरण झाली. हा नफा 2,507 टक्क्यांवर येऊन ठेपला. आकडेवारीनुसार, 10,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक लाभ मिळविणाऱ्या सरकारी बँकांमध्ये बँक ऑफ बडोदा (14,110 कोटी) आणि कॅनरा बँक (10,604 कोटी) यांचा सहभाग आहे.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.