शेतकऱ्यांच्या शेतातून तुमच्या घरापर्यंत,पतंजली गुलाब सरबताने असा बदलला ब्रिव्हरेज इंडस्ट्रीचा चेहरा

उन्हाळ्यात थंड पेयांना प्रचंड मागणी वाढत असते. बाबा रामदेव आणि बालकृष्ण आचार्य यांनी सुरु केलेल्या पंतजलीने संपूर्ण ब्रिव्हरेज इंडस्ट्रीला बदलून टाकले आहे.....

शेतकऱ्यांच्या शेतातून तुमच्या घरापर्यंत,पतंजली गुलाब सरबताने असा बदलला ब्रिव्हरेज इंडस्ट्रीचा चेहरा
| Edited By: | Updated on: Apr 20, 2025 | 4:39 PM

देशात तीव्र उन्हाळा सुरु असून शीतपेयांना खूपच मागणी आहे. सोडा, फ्रुट बेस्ड ज्यूस ड्रिंक्सची मागणी सतत वाढती आहे. तर बाबा रामदेव आणि बालकृष्ण आचार्य यांची कंपनी असलेल्या पंतजली आयुर्वेद कंपनीने गुलाब सरबतासोबत इतर प्रोडक्ट्सने संपूर्ण बिव्हरेज इंडस्ट्रीजलाच बदलून टाकण्याचे काम केले आहे. तुमच्या आरोग्याच्या रक्षणा सोबत पंतजलीने शेतकऱ्यांना यातून मोठा रोजगार मिळवून दिला आहे.

या शीतपेयाची खास बाब अशी की गुलाब सरबतासोबत इतर प्रोडक्ट्सने संपूर्ण इंडस्ट्रीजला बदलण्याचे काम केले आहे. या पतंजली आयुर्वेद गुलाब सरबतासाठी थेट शेतकऱ्यांकडून गुलाब खरेदी करते. यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत असते. तसेच गुलाब सरबत तयार करण्यासाठी पारंपारिक आयुर्वेदिक पद्धतीचा वापर केला जात आहे. या मुळे तुमच्या आरोग्याला यातून मोठा फायदा मिळत आहे.

गुलाब सरबताचा आरोग्यादायी सफर

पतंजली आयुर्वेदिक गुलाब सरबत तयार करण्यासाठी नैसर्गिक प्रक्रियेचा वापर करते. उदाहरणार्थ शेतकऱ्यांकडून थेट खरेदी केलेल्या गुलाबांच्या फुलांच्या पाकळ्याचा यात वापर केला जातो. यातील बहुतांशी फुले नैसर्गिकरित्या उगवलेली जातात. मधल्या दलालांची भूमिका यात कमी असल्याने या फुलांच्या अशुद्ध होण्याचा धोकाही टळतो.तसेच पंतजलीच्या सरबतात अन्य उत्पादनांच्या तुलनेत कमी साखर वापरली जाते. त्यामुळे पंतजलीचे सरबत आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे.

पतंजली म्हणजे आयुर्वेदाचा खजाना

बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी पतंजली आयुर्वेदची सुरुवात केली होती. त्यांचा उद्देश्य लोकांपर्यंत आयुर्वेदाचे फायदे सहजतेने पोहचावेत असा होता. त्यामुळे उन्हाळ्यात गर्मी साठी तयार केलेल्या या गुलाब सरबताला तयार करण्यासाठी कंपनीने त्याच मूलमंत्राचा वापर केला. या सरबतात अन्य औषधी वनस्पती देखील टाकलेल्या असतात. त्यामुळे उन्हाळ्यात गुलाब सरबताला इतकी मागणी आहे. या शिवाय कंपनीने उष्णते पासून सुटका करण्यासाठी पारंपारिक भारतीय पेय खस आणि बेल सरबत आदी आयुर्वेदिक सरबतांना देखील बाजारात उतरवले आहे.पंतजंली भारताच्या बिव्हरेज इंडस्ट्रीचा चेहरामोहराच बदलणार आहे.