ही तर केवळ सुरूवात… पेट्रोल-डिझेल दरवाढ… RBI चा तो मोठा इशारा… महागाईचा बॉम्ब फुटणार?
RBI Warning of Inflation: मध्य-पूर्वेतील युद्धाने जग होरपळले आहेत. भारतालाही त्याची मोठी झळ बसली आहे. गेल्या 10 दिवसात तीनदा इंधन दरवाढ झाली आहे. पण RBI ने मोठा इशारा दिला आहे. महागाईच्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागण्याचे मोठे संकेत केंद्रीय रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.

RBI Warning of Inflation: इस्त्रायल- इराण आणि नंतर अमेरिका – इराण यु्द्ध हे फेब्रुवारीपासून सुरू झाले आहे. अजूनही तणाव निवाळलेला नाही. दिवसागणिक मोठ्या युद्धाचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या युद्धामुळे जगावर ऊर्जा संकट कोसळले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम दिसला. महागाई वाढली आहे. त्याचवेळी RBI ने मोठा इशारा दिला आहे. युद्धाची स्थिती कायम राहिल्यास भारतात महागाईची दुसरी लाट येईल असा इशाराच केंद्रीय रिझर्व्ह बँकेने दिला आहे.
पेट्रोल- डिझेल महागणार?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मध्य-पूर्वेतील ताण-तणावावर मोठे भाष्य केले. जर युद्ध अजून लांबले तर ऊर्जा क्षेत्रात उलथापालथ होईल. इंधन किंमती वाढतील, व्यापारी तोटा होईल आणि रुपयावर मोठा दबाव येईल असे आरबीआयने स्पष्ट केले. युद्धामुळे जागतिक बाजारात कच्चे तेल आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमती वधारल्या आहेत. त्या अजून वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. देशात ऊर्जा संकटाचे संकेत मिळत आहेत. आरबीआयच्या इशाऱ्यानुसार, पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी, एलपीजीच्या किंमतीत मोठी वाढ होऊ शकते.
महागाईचा बॉम्ब फुटणार?
RBI ने महागाईविषयीही भाकीत केले आहे. जर युद्ध लांबले तर देशात महागाईची दुसरी लाट येईल असे केंद्रीय बँकेने स्पष्ट केले आहे. इंधन दरवाढीने दळणवळण आणि मालवाहतूक महागेल आणि परिणामी महागाईचा स्फोट होईल. सर्वच वस्तू महागतील असा इशारा बँकेने दिला आहे. यामुळे वाहतूक व्यवस्था आणि पुरवठा साखळीवर मोठा परिणाम होईल. आयात-निर्यात महाग होईल. त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होईल.
परदेशी गुंतवणूकदार गाशा गुंडाळतील
काही तज्ज्ञांच्या मते, महागाईचा स्फोट झाल्यास परदेशी गुंतवणूकदार देशातून गाशा गुंडाळतील. ते शेअर बाजारासह इतर ठिकाणची गुंतवणूक काढून घेतील. शेअर बाजारात मोठ्या चढउताराचे सत्र येईल. वर्ष 2021-25 मध्ये भारताची सरासरी वाढ 8.2% होती. RBI ने 2026-27 साठी जवळपास 6.9% वाढीचे संकेत दिले आहे. सध्या भारतातील महागाई 4 टक्क्यांच्या जवळपास आहे आणि नियंत्रणात आहे. पण जर इंधन संकट वाढले तर मात्र मोठा धोका निर्माण होण्याची भीती वर्तवली जात आहे.