AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुमारमंगलम बिर्लांच्या ‘त्या’ पत्रामुळे व्होडाफोन-आयडियाच्या समभागाच्या किंमतीत घसरण

Vodafone Idea | मंगळवारी व्होडाफोन-आयडियच्या समभागाने 6.03 रुपये ही 52 आठवड्यातील निच्चांकी पातळी गाठली होती. या कंपनीची आर्थिक अवस्था चांगली नाही. कंपनीच्या डोक्यावर तब्बल 50 हजार कोटींचे कर्ज आहे.

कुमारमंगलम बिर्लांच्या 'त्या' पत्रामुळे व्होडाफोन-आयडियाच्या समभागाच्या किंमतीत घसरण
व्होडाफोन आयडिया
| Edited By: | Updated on: Aug 05, 2021 | 6:32 AM
Share

मुंबई: आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला यांनी केंद्र सरकारला लिहलेल्या पत्रामुळे भांडवली बाजारात व्होडाफोन-आयडियाच्या समभागाने आपटी खाल्ली आहे. सलग दुसऱ्या दिवशी व्होडाफोन-आयडियचा समभाग डळमळीत होताना दिसला. बुधवारी दुपारच्या सत्रात या समभागाची किंमत 6.12 रुपये इतकी होती.

तत्पूर्वी मंगळवारी व्होडाफोन-आयडियच्या समभागाने 6.03 रुपये ही 52 आठवड्यातील निच्चांकी पातळी गाठली होती. या कंपनीची आर्थिक अवस्था चांगली नाही. कंपनीच्या डोक्यावर तब्बल 50 हजार कोटींचे कर्ज आहे. त्यामुळे व्होडाफोन-आयडियाकडून लवकरच गाशा गुंडाळला जाण्याची शक्यता आहे.

कुमारमंगलम बिर्ला यांनी पत्रात काय म्हटले होते?

आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या Vodafone-Idea लिमिटेड कंपनीतील आपला हिस्सा सरकार किंवा अन्य कंपनीला विकण्याची तयारी दर्शविली आहे. कुमार मंगलम बिर्ला यांनी कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांना पत्र लिहून यासंदर्भात माहिती दिली होती.

Vodafone-Idea लिमिटेडच्या डोक्यावर 58,254 कोटी रुपयांचे कर्ज होते. यापैकी 7,854.37 कोटी रुपयांचे कर्ज कंपनीने फेडले होते. मात्र, अजूनही कंपनीच्या डोक्यावर 50,399.63 कोटींचे कर्ज आहे. Vodafone-Idea लिमिटेडमध्ये कुमार मंगलम बिर्ला यांचा 27 टक्के हिस्सा आहे. त्यांनी राजीव गौबा यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, स्पेक्ट्रमचे पैसे भरण्यासाठी पुरेसा अवधी आणि अन्य काही गोष्टी जुळून न आल्याने कंपनीत कोणीही गुंतवणूक करण्यास इच्छूक नाही, असे कुमार मंगलम बिर्ला यांनी म्हटले. गेल्याच महिन्यात केंद्र सरकारने Vodafone-Idea लिमिटेडला परकीय गुंतवणुकीच्या माध्यमातून 15000 कोटी रुपयांचा निधी उभारण्याची परवानगी दिली होती. मात्र, सरकारी धोरणामुळे कोणीही कंपनीत गुंतवणूक करण्यास तयार नाही, असे कुमारमंगलम बिर्ला यांनी पत्रात म्हटले होते.

व्होडाफोन आयडियाने आपल्या 27 कोटी वापरकर्त्यांना दिला इशारा

व्होडाफोन आयडिया (Vi) ने आपल्या 27 कोटी वापरकर्त्यांना ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांपासून दूर राहण्यास सांगितले आहे. हे फसवणूक करणारे नो युवर कस्टमर (KYC) च्या माध्यमातून वापरकर्त्यांना लक्ष्य करत आहेत. सायबर फसवणुकीसंदर्भात एअरटेलने जारी केलेल्या अॅडवायजरीनंतर व्हीआय(Vi)चा इशारा आला आहे. एअरटेलच्या सर्व ग्राहकांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात फसवणूक करणारे नवीन तंत्रज्ञानाद्वारे मोबाईल वापरकर्त्यांना कसे शिकार बनवत आहेत हे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाळ विठ्ठलल यांनी सांगितले आहे. असाच एक प्रकार आता व्हीआय(Vi) सब्सक्राइबर्समध्येही दिसून येत आहे, जिथे व्होडाफोन आयडियाचे कर्मचारी बनून फसवणूक करणारे लोक त्यांचा वैयक्तिक डेटा लोकांकडून घेत आहेत आणि वापरकर्त्यांना धमकावत आहेत. यापासून सावध राहावे, असे कंपनीच्यावतीने ग्राहकांना सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या:

सावधान! व्होडाफोन आयडियाने आपल्या 27 कोटी वापरकर्त्यांना दिला इशारा, जिओ आणि एअरटेल वापरकर्त्यांनीही सतर्क रहा

व्होडाफोन, आयडिया युजर्ससाठी आनंदाची बातमी, आता या 23 रिचार्ज पॅकवर मिळवा 60 रुपयांपर्यंत कॅशबॅक

Good News! आता एकच अकाऊंट 25 जणांमध्ये वापरा, Idea आणि Vodafone ची धमाकेदार ऑफर

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.