AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan Crime : पोलीस आणि बँक कॅशिअर असल्याची बतावणी करत दुकानचालकांना लुटायचे, अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकले !

कल्याणमधील कोळसेवाडी पोलीस ठाण्याअंतर्गत परिसरात गुन्हेगारी घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच उरला नसल्याचे दिसून येत आहे.

Kalyan Crime : पोलीस आणि बँक कॅशिअर असल्याची बतावणी करत दुकानचालकांना लुटायचे, अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकले !
सायकल दुकानदाराची फसवणूक करणारे जोडपे अटकImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Aug 18, 2023 | 9:29 PM
Share

कल्याण / 18 ऑगस्ट 2023 : कल्याणमध्ये फसवणुकीच्या घटना थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. फसवणूक करण्यासाठी आरोपींचे वेगवेगळे फंडे पाहून पोलीसही चक्रावले आहेत. नुकतीच एक फसवणुकीची घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. एका सायकल दुकानदाराला एका जोडप्याने गंडा घातल्याची घटना घडली. आपण बँकेत कॅशिअर असून, आपली पत्नी विष्णुनगर पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी असल्याची बतावणी केली. मग सायकल बुक केली. त्यानंतर पर्स विसरली सांगून दुकानदाराला चेक देत त्या बदल्यात त्याच्याकडून पैसे घेऊन फरार झाले. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 420, 170, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

चक्की नाका कल्याण पूर्व येथील प्रकाश सायकल स्टोअर्स नावाचे दुकान आहे. महेंद्र बाबुराव यादव नामक व्यक्ती एका महिलेसोबत 24 जून रोजी दुपारी सायकलच्या दुकानात गेला. यादवने आपण बीआय बँकेत कॅशिअर असून, माझी पत्नी विष्णुनगर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक असल्याचे सांगितले. जोडप्याने दोन सायकल बुक केल्या. त्यानंतर दोन सायकलचे बिल 30 रुपये चेकद्वारे दिले. यानंतर चेक क्लिअर झाल्यानंतर 9 जुलै रोजी गाडी पाठवतो. सायकल पाठवून द्या सांगितले.

दुकानात जायला निघाले आणि महिलेने दुकानदाराला आपण पर्स गाडीत विसरलो असून, मला 10 हजार रुपये द्या सांगितले. त्या बदल्यात तिने 10 रुपयांचा चेकही दिला. त्यानंतर सायंकाळी पुन्हा यादव याने फोन करुन अडीच हजार रुपयांची गरज असल्याचे सांगत फोन पे करायला सांगितले. त्याप्रमाणे पुन्हा दुकानदाराने पैसे पाठवले. मात्र पैसे मिळताच आरोपींनी मोबाईल बंद करुन पोबारा केला.

दुकानदार तेव्हापासून वारंवार जोडप्याला फोन लावत आहे. मात्र आरोपींचा फोन लागत नाही. तसेच ते पुन्हा दुकानातही आले नाहीत. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दुकानमालक भावेश चौधरी यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दुकान मालकाच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी तक्रार दाखल करत आरोपींचा शोध सुरु केला आहे. अखेर आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.