AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेडिकलमध्ये चालला होता तरुण, वाटेत मित्रांचे कुणासोबत भांडण सुरु होते; मध्यस्थी करायला गेला अन्…

मानपाडा येथील तरुण रात्रीच्या सुमारास मेडिकलमध्ये औषध घेण्यासाठी चालला होता. यावेळी रस्त्यात त्याला त्याच्या मित्रांशी कुणीतरी भांडत असल्याचे दिसले. तरुण मध्यस्थी करायला गेला.

मेडिकलमध्ये चालला होता तरुण, वाटेत मित्रांचे कुणासोबत भांडण सुरु होते; मध्यस्थी करायला गेला अन्...
डोंबिवलीत मित्रांचे भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर हल्लाImage Credit source: TV9
| Updated on: Mar 28, 2023 | 10:19 AM
Share

डोंबिवली / सुनील जाधव : मित्रांचे भांडण सोडवायला जाणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. भांडण सोडवायला आलेल्या 29 वर्षीय तरुणावरच जीवघेणा हल्ला केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. डोंबिवली मानपाडा रोडवरील गावदेवी मंदिर परिसरात ही घटना घडली. विजय आवटे असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून, यात तो गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या दोन तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत. इतर आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

मेडिकलमध्ये चालला होता तरुण

डोंबिवली पूर्वेत राहणारा विजय आवटे हा शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास मानपाडा रोडवरील गावदेवी मंदिर जवळील मेडिकलमध्ये गोळी आणण्यासाठी गेला होता. यादरम्यान त्याठिकाणी त्याने त्याच्या सुयोग आणि सचिन नावाच्या मित्रांचे काही लोकांबरोबर भांडण सुरू असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. विजयने त्या ठिकाणी जाऊन मध्यस्थी करत मित्रांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला.

मध्यस्थी करायला गेला म्हणून हल्ला

याचाच राग मनात धरून विजयला एका टोळीतील 5 तरुणांनी मिळून धमकी देत लाथा-बुक्यांनी मारहाण केली. यानंतक विजयवर चाकूने सपासप वार केले. या मारहाणीत विजय हा गंभीर जखमी झाला आहे. विजयवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी डोंबिवली टिळकनगर पोलीस ठाण्यात पाच आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर यात तीन आरोपी अजूनही फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.