AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | गंगापूरमधून गायब झालेल्या तरुणीचा मृतदेह दोन दिवसांनी नदीत सापडला, आत्महत्या की घातपात? गूढ कायम!

11 जून रोजी सकाळी साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास एका तरुणीचा मृतदेह गोदावरी नदीपात्रात तरंगताना नागरिकांना दिसला. नागरिकांनी तत्काळ ही माहिती पोलिसांना दिली.

Aurangabad | गंगापूरमधून गायब झालेल्या तरुणीचा मृतदेह दोन दिवसांनी नदीत सापडला, आत्महत्या की घातपात? गूढ कायम!
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jun 12, 2022 | 5:36 PM
Share

औरंगाबादः दोन दिवसांपूर्वी घरातून बाहेर पडलेल्या 22 वर्षीय तरुणीचा अखेर मृतदेहच पोलिसांना सापडला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील (Gangapur Taluka) बाबरगाव येथील ही तरुणी 09 जूनपासून बेपत्ता (Girl Missing) होती. कुटुंबियांच्या तक्रारीनुसार पोलीस संबंधित परिसरात तिचा शोध घेत होते. मात्र 11 जून रोजी औरंगाबाद-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील जुना कायगाव टोका येथील गोदावरी (Godawari river) नदीपात्रात तिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. हे पाहून नागरिकांमध्ये एकच खळबळ माजली. मृत तरुणी दिव्या दंडे ही  22 वर्षांची होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. घरातून एकाएकी गायब झालेल्या तरुणीनी आत्महत्या केली की तिच्याबाबत काही घातपात झालाय, याचा तपास घेण्यांचं आव्हान पोलिसांसमोर आहे. सध्या तरी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

दोन दिवसांपासून बेपत्ता

सदर, घटनेबाबत अधिक माहिती अशी की गंगापूर तालुक्यातील बाबरगाव येथील  22 वर्षीय तरुणी दिव्या ही  09 जूनपासून घरातून बेपत्ता होती. रात्री उशीरापर्यंत ती घरी न आल्याने पोलिसांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार केली. तेव्हापासून तिचा शोध सुरु होता.

कुजलेल्या स्थिती मृतदेह

दरम्यान, 11 जून रोजी सकाळी साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास एका तरुणीचा मृतदेह गोदावरी नदीपात्रात तरंगताना नागरिकांना दिसला. नागरिकांनी तत्काळ ही माहिती पोलिसांना दिली. त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. तिचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. त्यानंतर तिची ओळख पटली. सदर तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. नातेवाईकांच्या परवानगीने पोलिसांनी डॉक्टरांमार्फत तिचे शवविल्छेदन केले.

नैराश्यातून आत्महत्या?

सदर तरुणीने एका जवळच्या व्यक्तीच्या विरहाचे स्टेटस ठेवून आत्महत्या केली असावी, अशी चर्चा परिसरात सुरु आहे. मात्र पोलीस किंवा कुटुंबियांकडून याबाबत काहीही भाष्य करण्यात आलेले नाहीत. येत्या काही दिवसात पोलीस या प्रकरणाचा उलगडा करतील.

Follow Us
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल, रोजगार टिकवण्यासाठी उपाययोजनांची मागणी
भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या...
Pune | भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारावर हिंदू महासभेचे आनंद दवे आक्रमक
फडणवीसांचे उत्तर: चाकण MIDC मधील ७६% बंद कंपन्या ‘डिफंक्ट’ होत्या
चाकण एमआयडीसीतील कंपन्या बंद: फडणवीसांनी पवारांना दिले उत्तर
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके